AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डेटींग करताना अशा 5 लोकांपासून सावध राहा; अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकाल

डेटींग आणि नात्याची सुरुवात सुंदर असली तरी, चुकीचा जोडीदार आयुष्य कठीण करू शकतो. त्यामुळे नात्यात येताना, किंवा डेटींग करताना तसेच प्रेमात पडताना त्या व्यक्तीच्याबाबत काही सवयी लक्षात घेणे फार गरजेच्या असतात अन्यथा नाते तसेच तुम्हीही अडचणीत येऊ शकता. तर अशा कोणत्या सवयी आहेत ज्या डेटींग करताना त्या व्यक्तीमध्ये पाहिल्या पाहिजेत म्हणजे नाते पुढे जाऊन तणावपूर्ण ठरणार नाही.

डेटींग करताना अशा 5 लोकांपासून सावध राहा; अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकाल
5 Toxic People to Avoid in Dating, Be Careful for Healthy RelationshipsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 30, 2025 | 6:46 PM
Share

डेटिंग करण किंवा कोणत्याही नव्या नात्याची सुरुवात करणं ही आयुष्यातील एक सुंदर गोष्ट असते. नेहमी असं म्हटलं जातं की, नात्याची सुरुवात ही कायम खरेपणाने आणि खऱ्या भावनेने झाली पाहिजे. जिथे दोन लोक एकमेकांना समजून घेतात आणि एकत्र वेळ घालवतात. हे नाते अखेरीस प्रेम आणि लग्नापर्यंत पोहोचू शकते. तथापि, जर जोडीदार बरोबर नसेल तर हा प्रवास कठीण आणि वेदनादायक ठरू शकतो.म्हणून एखाद्या व्यक्तीसोबत नात्यात येताना किंवा कोणासोबत डेटींगला जाताना काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे असते. तसेच काही सवयी अशाही असतात ज्या ओळखायला आल्या तर लगेचच अशा व्यक्तींपासून दूर राहणेच चांगले ठरेल. अन्यथा अडचणी नक्कीच वाढू शकतात.

अशा व्यक्तींपासून दूर राहा

नेहमी खोटे बोलणारे लोक

जर कोणी लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टीबद्दल खोटे बोलत असेल, तर अशा व्यक्तींशी नाते टिकवणे खूप कठीण असते. खोटे बोलल्याने विश्वास तुटतो आणि नाते हळूहळू कमकुवत होते. जेव्हा विश्वास नसतो तेव्हा प्रेम आणि समजूतदारपणा टिकू शकत नाही. अशा व्यक्तीभोवती तुम्हाला नेहमीच संशयास्पद आणि अस्वस्थ वाटत राहिलं. म्हणून, अशा लोकांपासून अंतर राखणे शहाणपणाचे ठरेल.

सतत रागावणारे अन् आक्रमक लोक

काही लोक अगदी लहानसहान गोष्टींवरही खूप रागावतात, दुसऱ्या व्यक्तीच्या भावनांचा विचार करत नाहीत. सतत राग राग करणाऱ्या व्यक्तीसोबत राहणे सोपे नसते. असे लोक अनेकदा त्यांच्या शब्दांनी किंवा वागण्याने तुम्हाला दुखवू शकतात. सुरुवातीला त्यांचा राग किरकोळ वाटू शकतो, परंतु हळूहळू हा राग नात्याला विषारी बनवू शकतो. अशा परिस्थितीत नात्यात फक्त भीती आणि तणाव याच गोष्टी राहतात.

जे लोक फक्त स्वतःबद्दल विचार करतात

जेव्हा दोघेही व्यक्ती एकमेकांच्या भावनांचा आदर करतात तेव्हाच ते नाते सुंदर बनते. तथापि, जर एखादी व्यक्ती फक्त स्वतःच्या गरजा आणि इच्छांवर लक्ष केंद्रित करते आणि दुसऱ्या व्यक्तीच्या भावनांकडे दुर्लक्ष करते, तर असे नाते अनेकदा टीकत नाही. अशा लोकांना इतरांच्या दुःखाची किंवा आनंदाची पर्वा नसते. त्यांना फक्त स्वतःच्या सोयीची काळजी असते. जर तुम्ही अशा लोकांशी नाते निर्माण केले तर तुम्हाला एकाकीपणा आणि दुर्लक्ष सहन करण्याशिवाय काहीही मिळणार नाही. त्यामुळे अशा लोकांपासूनही दूर होणेच चांगले

सवयींमध्ये निष्काळजी आणि बेजबाबदार असलेले लोक

बेजबाबदार व्यक्तीसोबत राहणे कठीण असते. असे लोक त्यांच्या जबाबदाऱ्या टाळतात आणि लहानसहान गोष्टीही गांभीर्याने घेत नाहीत. जे लोक प्रत्येक गोष्टीत निष्काळजी असतात ते त्यांच्या नातेसंबंधातही निष्काळजीपणा दाखवत असतात. अशा लोकांसोबतचे जीवन अस्थिर आणि तणावपूर्ण असू शकते कारण त्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण असते. तसेच ते पुढे कोणतेही जबाबदारी नीट घेऊ शकत नाही. अशा व्यक्तीसोबत न राहणे कधीही चांगले.

जे लोक नेहमी नकारात्मक विचार करतात

जर एखाद्याला प्रत्येक परिस्थितीत फक्त नकारात्मकताच दिसत असेल तर त्याचा तुमच्या मनावर परिणाम होऊ शकतो. नकारात्मक विचार करणारे कधीही आनंदी नसतात आणि ते इतरांनाही आनंदी राहू देत नाहीत. त्यांच्या आजूबाजूला राहिल्याने हळूहळू व्यक्तीचा आत्मविश्वास आणि आशा कमी होते. नात्यात सकारात्मकता आणि उत्साह नसतो तर प्रेम अपूर्ण राहते. म्हणून, अशा लोकांसोबत जास्त काळ घालवल्याने मानसिक थकवा येतो. त्यामुळे अशा व्यक्तीसोबत नात्यात राहणे म्हणजे मानसिक स्थिती बिघडवून घेण्यासारखे आहे. त्यासाठी असे नातेही टाळलेले बरे.

गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय
गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय.
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?.
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता.
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी.
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता.
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका.
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया.
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले.
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल.