AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिर्ची खाल्ली किंवा तिखट लागल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळा, महागात पडेल चूक; 90 टक्के लोकांना माहित नसेल कारण

मिर्ची खाल्ल्यावर किंवा तिखट लागल्यावर तुम्हीही लगेच पाणी पित असाल तर आधी ही सवय थांबवा. अन्यथा जास्त त्रास होऊ शकतो. त्याऐवजी पटकन या पदार्थांचे सेवन करा पण पाणी पिऊ नका. याचं कारण बऱ्याच जणांना माहित नसेल.

मिर्ची खाल्ली किंवा तिखट लागल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळा, महागात पडेल चूक; 90 टक्के लोकांना माहित नसेल कारण
Avoid drinking water after eating chili or anything spicyImage Credit source: Meta AI
| Updated on: Jun 20, 2025 | 5:47 PM
Share

अनेकांना मसालेदार पदार्थ खायला आवडतात. पण अचानक अनेकदा दाताखाली पटकन मिर्ची येते जीभ झोंबू लागते. तोंडाची जळजळ होते. डोळ्यांतून पाणी येऊ लागते आणि कान आणि डोळे लाल होऊ लागतात. अशा वेळी, लोक सहसा टेबलावर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलतात आणि संपूर्ण पाणी पितात. पण, यामुळे पोट भरतं पण जळजळ काही कमी होत नाही. उलट, पाणी पिल्याने तोंडापासून पोटापर्यंत जळजळ अजून वाढते. मग मिर्ची खाल्ल्यावर पाणी पिणे योग्य नसेल तर मग तोंडांची जळजळ कमी करण्यासाठी नक्की काय करावं, जेणेकरून तोंडात होत असेलला तिखटाचा त्रास पटकन कमी होईल? चला जाणून घेऊयात.

पाण्याऐवजी हा पदार्थाचे सेवन करा

मिरच्यांच्या जळजळीपासून आराम मिळवण्यासाठी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन खूप प्रभावी आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये केसीन नावाचे रसायन असते . ते त्वचे आणि तोंडातील जळजळीला त्वरित शांत करते.जर तुम्ही दूध, दही किंवा अशा गोष्टी काही काळ तोंडात ठेवल्या तर तुम्हाला जळजळ होण्यापासून त्वरित आराम मिळेल. हा उपाय हातांवर जळजळ झाल्यास देखील उपयुक्त आहे.

गोड पदार्थ खा जर त्यावेळी तुमच्या जवळ दूध उपलब्ध नसेल तर लगेच काहीतरी गोड पदार्थ खा. विशेषतः दुधापासून बनवलेल्या मिठाई जळजळ लवकर शोषून घेण्याचे काम करतात. यामुळे थोड्याच वेळात आराम मिळतो.

पाणी पिणे टाळा पाणी पिल्याने मिर्ची जळजळ कमी होण्याऐवजी वाढते. मिर्चीमध्ये असलेले कॅप्सेसिन हे तेल-आधारित संयुग आहे, जे पाण्यासोबत पसरू शकते आणि पोट आणि आतड्यांमध्ये आणखी जळजळ होऊ शकते. म्हणून, पाण्याऐवजी दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करावे.

पाणी पिऊन या वेदना जास्त वाढण्याची शक्यता

खरंतर, खूप मिर्च्या जेवणातून पोटात जाणे किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर, जळजळ होण्याची भावना अनेकांसाठी खूप वेदनादायक असू शकते.त्यामुळे कधी तिखट खाल्ल्याने तोंड भाजलं किंवा जळजळ झाली तर पाणी पिण्याऐवजी गोड पदार्थ खा. अन्यथा पाणी पिऊन या वेदना जास्त वाढण्याची शक्यता असते.

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.