AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंजीर खाण्याचे फायदे मोठे, जाणून घ्या अंजीर भिजवलेले पाणी पिऊ शकतो का?

अंजीर हे उन्हाळ्यात पोटासाठी खूप फायदेशीर आहे. अंजीर भिजवल्यानंतर खाण्याचा सल्ला दिला जातो. आज आपण जाणून घेणार आहोत की अंजीर भिजवून का खावे आणि उरलेले पाणी आपण पिऊ शकतो का?

अंजीर खाण्याचे फायदे मोठे, जाणून घ्या अंजीर भिजवलेले पाणी पिऊ शकतो का?
| Updated on: May 15, 2024 | 10:28 PM
Share

अंजीर हे सुपरफूड मानले जाते. तुम्ही फळ आणि ड्राय फ्रूट म्हणून अंजीर नक्कीच खाऊ शकता. पण वाळलेले अंजीर लवकर खराब होत नाहीत. अंजीर आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. अंजीर हे नेहमीच पाण्यात भिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे उष्णता दूर होते आणि पोटासाठी अधिक फायदेशीर सिद्ध होते. तुम्हाला जर अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्ही भिजवलेले अंजीर नक्की खालले पाहिजे. 1-2 अंजीर दररोज पाण्यात भिजवून सकाळी खावेत. मात्र, अंजीर भिजवलेले पाणी प्यावे की फेकून द्यावे हे काही लोकांना माहित नाही.

भिजवलेले अंजीर खाण्याचे फायदे?

  • भिजवलेले अंजीर खाल्ल्याने दीर्घकालीन बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. अंजीरमध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे पोट साफ होते.
  • फायबरमध्ये भरपूर आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने अंजीर रक्तातील साखर नियंत्रित करते.
  • मधुमेह कमी करण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी रात्री पाण्यात भिजवलेले अंजीर खावे.
  • दररोज भिजवलेले अंजीर खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.
  • पीएमएस आणि पीसीओडी रुग्णांसाठीही अंजीर खूप फायदेशीर ठरते.
  • गर्भवती मातांसाठीही अंजीर फायदेशीर मानले जाते.
  • अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.

आपण अंजीर भिजवलेले पाणी पिऊ शकतो का?

तुम्ही 2-3 अंजीर घेऊन ते ते रात्रभर 1 ग्लास पाण्यात भिजवावे. रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्यानंतर सकाळी प्रथम ते अंजीर खावून घ्या. यानंतर अंजीर भिजवलेले पाणी प्या. यामुळे तुम्हाला त्वरित ऊर्जा मिळेल.

अंजीरमध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे पचनाची समस्या दूर होते. अंजीर हे कमी उष्मांक असलेले अन्न आहे ज्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के आणि अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट असतात. अंजीर खाल्ल्याने शरीराला कॅरोटीन, ल्युटीन, टॅनिन आणि क्लोरोजेनिक ॲसिड मिळते. अंजीराचे सेवन फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करते. मधुमेही रुग्णही अंजीर खाऊ शकतात. जर तुम्ही फळ म्हणून ताजे अंजीर खाल्ले तर ते व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, पॅन्टोथेनिक ॲसिड, पायरीडॉक्सिन, नियासिन आणि फोलेट्स पुरवतात.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.