
दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा असली की विद्यार्थ्यांना टेन्शन येतंच. हे टेन्शन कमी व्हावं, यासाठी पालकांचेही वेगवेगळे प्रयत्न सुरूच असतात. पण, आज आम्ही यावर एक खास उपाय सांगणार आहोत. त्यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही. फक्त पुढील चार योगासने जाणून घेऊया.
बोर्डाची परीक्षा हा मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचा काळ असतो. प्रत्येक मुलाला बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतात. पण या काळात मुलांना खूप ताणही येतो. अशा वेळी मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. परीक्षेदरम्यान मानसिक आणि शारीरिक थकवा टाळण्यासाठी मुलांनी योगा करावा.
10 ते 15 मिनिटे काही आसनांचा सराव केल्याने शरीराला आराम तर मिळतोच पण मनही ताजेतवाने होते. यामुळे अभ्यास आणि परीक्षेत चांगली कामगिरी करता येते.
ताडासन हे एक सोपे आणि प्रभावी आसन आहे. यामुळे शरीराला ताणण्याबरोबरच ऊर्जा मिळते. हे आसन उभे राहून केले जाते. मुलांना ताडासन केल्याने शरीरात लवचिकता तर येतेच, शिवाय मानसिक ताणही कमी होण्यास मदत होते.
कृती
वृक्षासन हे संतुलन आणि मानसिक शांती वाढवणारे एक आसन आहे. परीक्षेच्या काळात मानसिक संतुलन राखण्यासाठी हे आसन उपयुक्त ठरू शकते.
कृती
शरीराला आराम देण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी हे आसन अतिशय प्रभावी आहे. यामुळे शरीराचा मागचा भाग ताणला जातो.
कृती
खोल श्वास घेतल्याने मानसिक शांती आणि एकाग्रता वाढते. बोर्डाच्या परीक्षेदरम्यान मुलांना अस्वस्थ आणि तणाव जाणवू शकतो, म्हणून दीर्घ श्वास घेतल्यास त्यांचे मन शांत राहते.
कृती
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)