AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय सांगता धूप, अगरबत्तीचा धूर हा सिगारेटच्या धुरापेक्षा जास्त विषारी; आरोग्यावर होऊ शकतात हे 5 परिणाम

वातावरण प्रसन्न करण्यासाठी देवाजवळ दिवा लावतो, धूप, अगरबत्ती लावतो. पण तुम्हाला माहितीये का की हेच आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. होय धूप, अगरबत्तीमधून निघणारा हा धूर सिगारेटपेक्षाही हानिकारक ठरू शकतो. कसं ते पाहुया.

काय सांगता धूप, अगरबत्तीचा धूर हा सिगारेटच्या धुरापेक्षा जास्त विषारी; आरोग्यावर होऊ शकतात हे 5 परिणाम
Burning incense and incense sticks at home is dangerous to healthImage Credit source: Meta AI
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Jun 21, 2025 | 7:36 PM
Share

रोज सकाळी-संध्याकाळी घरातील वातावरण प्रसन्न करण्यासाठी देवाजवळ दिवा लावतो, धूप, अगरबत्ती लावतो. पण तुम्हाला माहितीये का की हेच आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. होय, यामुळे नकळत आरोग्याला मोठे नुकसान होत आहे. जर तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटले पण हे खरं आहे, अगरबत्ती लावल्यानंतर म्हणजे जाळल्यानंतर त्यातून निघणारा धूर आरोग्यासाठी अनेक मोठे धोके निर्माण करू शकतो. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की अगरबत्ती आणि धूपबत्तीमध्ये वापरल्या जाणाऱ्या पॉलीएरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAH) चा फुफ्फुसांवर खूप वाईट परिणाम होतो. धार्मिक विधी आणि पूजागृहांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अगरबत्ती आणि धुपामुळे आरोग्याला काय नुकसान करतात ते जाणून घेऊया.

अगरबत्ती जाळल्याने आरोग्यावर होणारे हानिकारक परिणाम

फुफ्फुसांवर वाईट परिणाम अगरबत्तीच्या धुरात असलेले रसायन फुफ्फुसांना हानी पोहोचवतात. अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की अगरबत्ती आणि धुपामध्ये वापरल्या जाणाऱ्या पॉली अ‍ॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAH) चा फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो. त्यातून निघणाऱ्या धुराचा शरीराच्या पेशींवर वाईट परिणाम होतो आणि तो सिगारेटच्या धुरापेक्षा जास्त विषारी असतो. अगरबत्तीच्या धुरात असलेले रसायन फुफ्फुसांच्या पडद्यांमध्ये संसर्ग निर्माण करू शकतात. त्याच्या धुराच्या सतत संपर्कात राहिल्याने फुफ्फुसांच्या पेशींमध्ये अॅलर्जी होऊ शकते.

त्वचेची अ‍ॅलर्जी अगरबत्ती आणि अगरबत्तीचा जास्त काळ वापर केल्याने डोळे आणि त्वचेशी संबंधित अॅलर्जी होऊ शकते. या गोष्टी जाळल्याने निघणाऱ्या धुरामुळे डोळ्यांना जळजळ होते. तर संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना या धुराच्या संपर्कात येताच त्वचेला खाज येऊ शकते.

मेंदूवर वाईट परिणाम होतो सुगंधित उदबत्ती आणि धुपामधून निघणाऱ्या रासायनिक धुराचा व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. या गोष्टींचा दीर्घकाळ वापर केल्याने डोकेदुखी, एकाग्रतेचा अभाव, स्मृतिभ्रंश आणि अल्झायमर सारख्या आजारांचा धोका देखील वाढू शकतो.

श्वसन क्षमतेवर वाईट परिणाम सीपीसीबी पॅनेलनुसार, या धुराचा श्वसनसंस्थेवरही परिणाम होतो. अनेक संशोधनांनुसार, अगरबत्तीच्या धुराच्या सतत संपर्कात राहिल्याने श्वसन क्षमतेवर 30 टक्के परिणाम होऊ शकतो असही म्हटलं जातं. अगरबत्तीच्या धुरात असलेले कण, वायू आणि सेंद्रिय संयुगे श्वसनमार्गाद्वारे शरीरात पोहोचल्यावर वायुमार्ग कमकुवत करतात.

कर्करोगाचा धोका अगरबत्ती आणि धुपाच्या धुराचा फुफ्फुसांच्या आरोग्यावर विशेषतः वाईट परिणाम होतो. या धुरात जास्त काळ राहिल्याने दमा, सीओपीडी, फुफ्फुसांचा कर्करोग, श्वासनलिकेचा कर्करोग, स्मृतिभ्रंश, डोकेदुखी, मायग्रेन यासारख्या समस्यांचा धोका देखील वाढू शकतो

पर्याय काय? सुगंधी अगरबत्ती घेताना एकतर त्या नैसर्गिकरित्या बनवलेल्या असतील याची खात्री करून घ्या किंवा घरात देवाला वाहिलेली फूले सुकवून त्यात तूप, कापूर, वैगरे नैसर्गिक घटक वापरून त्यापासून धुपकांडी तयार करू शकता.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत