AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात डायबिटीस रुग्णांना फूट अल्सर आणि यूटीआयचा धोका; कशी घ्यावी काळजी?

पावसाळ्यात मधुमेहाचे रुग्णांना अधिक त्रास होण्याची शक्यता असते. पायाचा संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे या रुग्णांनी पावसाळ्यात संपूर्ण शरीराची, आरोग्याची काळजी घेणे तर महत्त्वाचे असतेच. पण सगळ्याच जास्त काळजी आपल्या पायांची घ्यावी. अन्यथा अनेक अॅलर्जी , जखमा होण्याची शक्यता असते. त्यासाठी काय करावं? जाणून घेऊयात.

पावसाळ्यात डायबिटीस रुग्णांना फूट अल्सर आणि यूटीआयचा धोका; कशी घ्यावी काळजी?
foot ulcersImage Credit source: Meta AI
| Updated on: Jun 30, 2025 | 6:43 PM
Share

पावसाळा म्हटलं की, अनेक आजारांना निमंत्रण असतं. त्यात मधुमेहाच्या रुग्णांनी पावसाळ्यात तर जास्त काळजी घेणे गरजेचे असते. मधुमेहाच्या रुग्णांनी पावसाळ्यात आजारांपासून दूर राहणे आवश्यक असते. पावसाळ्यात तापमान बदलत राहते आणि हवेतील आर्द्रता वाढते. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना अनेक प्रकारचे संसर्ग होऊ शकतात. या ऋतूमध्ये रक्तातील साखर अनियंत्रित होण्याचा, पायांमध्ये अल्सर, मूत्रमार्गात संसर्ग आणि त्वचेच्या समस्या होण्याचा धोका जास्त असतो. या ऋतूमध्ये एक छोटीशी निष्काळजीपणा मोठ्या त्रासाचे कारण बनू शकते. मधुमेहाचे रुग्ण पावसाळ्यात या समस्या कशा टाळू शकतात हे आपण जाणून घेऊयात.

पावसाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते

तज्ज्ञांच्या मते पावसाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात वाढत्या आर्द्रतेमुळे आणि पाण्यामुळे आजार पसरण्याचा धोका वाढतो. मधुमेहाच्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती आधीच कमकुवत असते आणि या आजारांमुळे रोगप्रतिकारक शक्ती आणखी कमकुवत होऊ शकते. यामुळे पचनाच्या समस्या, त्वचेचे संक्रमण, पायाचे अल्सर, यूटीआय आणि डायबेटिक न्यूरोपॅथीचा धोका वाढतो.

पावसाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांची रक्तातील साखर देखील अनियंत्रित होऊ शकते.

पावसाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांची रक्तातील साखर देखील अनियंत्रित होऊ शकते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवर घणे आणि तुमच्या आहाराची काळजी घेणे महत्त्वाचे असते. दररोज रक्तातील साखरेचे निरीक्षण करा आणि दर तीन महिन्यांनी HbA1C चाचणी करा. बरेच रुग्ण वेळोवेळी चाचणी करत नाहीत, ज्यामुळे त्यांना अनेक गंभीर संसर्ग होण्याचा धोका असतो. नियमितपणे चाचणी केल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास आणि पायाचे अल्सर टाळण्यास मदत होते.

पायांची काळजी कशी घ्यावी?

मधुमेही रुग्णांनी या ऋतूत अनवाणी चालणे टाळावे आणि त्यांचे पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवावेत. याशिवाय पायात अल्सर टाळण्यासाठी चांगल्या दर्जाचे आरामदायी शूज घालणे गरजेचे आहे. मधुमेही रुग्णांमध्ये, लहान जखमा देखील संसर्गास कारणीभूत ठरू शकतात.तुमचे पाय साबणाने चांगले धुवा. पाय धुतल्यानंतर तुमचे पाय पूर्णपणे कोरडे करा आणि ओले किंवा घामाने आलेले मोजे किंवा शूज ताबडतोब काढून टाका.

तुमच्या पायाच्या नखांची काळजी घ्या.

नखांना वेळोवेळी कापा,बोटांच्या कोपऱ्यात कापू नका. नथे कापताना इजा होणार नाही याची काळजी घ्या. किंवा फार ओढून नखे, कापू नका.जर तुम्हाला मधुमेह असेल तर पायाच्या किरकोळ समस्येवर उपचार करण्यासाठी वाट पाहू नका. पायाच्या दुखापती आणि संसर्गाची त्वरित तपासणी करा. किरकोळ समस्यांमुळे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेत राहा

तर, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मधुमेहाच्या रुग्णांनी घरी दररोज व्यायाम करावा आणि ताजे घरगुती अन्न खावे. रस्त्यावरील पदार्थ टाळावेत. तेलकट, प्रक्रिया केलेले अन्न टाळावे. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवर घ्यावीत. नियमितपणे पौष्टिक आहार घ्यावा. जर तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीत नियमितपणे चढ-उतार दिसून आले तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Follow Us
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?.
खरातच्या पेन ड्राईव्हमध्ये 3 मंत्री, म्हणून अशोक खरातचा एन्काऊंटर?
खरातच्या पेन ड्राईव्हमध्ये 3 मंत्री, म्हणून अशोक खरातचा एन्काऊंटर?.
दादांच्या घातपाताचा कट? मुडदाही खोदून काढू; मुख्यमंत्र्यांनी घेतला....
दादांच्या घातपाताचा कट? मुडदाही खोदून काढू; मुख्यमंत्र्यांनी घेतला.....
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.