Gautam Buddha Quotes: ‘तीन गोष्टी जास्त काळ लपू शकत नाहीत – सुर्य, चंद्र आणि सत्य’, बुद्धांचे महत्वाचे विचार वाचा…

Gautam Buddha Quotes: गौतम बुद्धांच्या वचनांचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला जीवनाचा खरा मार्ग सापडतो. गौतम बुद्धाने दु:ख हेच जगातील सर्वात मोठे सत्य आहे असे सांगितले आहे. वैशाख पौर्णिमा म्हणजेच गौतम बुद्धाच्या जन्मदिनानिमित्ताने त्यांचे काही विचार जाणून घेऊयात...

Gautam Buddha Quotes: तीन गोष्टी जास्त काळ लपू शकत नाहीत - सुर्य, चंद्र आणि सत्य, बुद्धांचे महत्वाचे विचार वाचा...
Gautam Buddha Quotes
| Updated on: Apr 30, 2026 | 10:00 PM

Buddha Purnima 2026: बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध (Gautam Buddha) यांना भगवान बुद्ध, सिद्धार्थ आणि महात्मा बुद्ध नावाने देखील ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या. अद्वितीय आणि अलौकिक आध्यात्मिक ज्ञानाने लोकांच्या जीवनाला बदलून टाकले आहे. त्यांचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला होता. त्यांना बोधी वृक्षाच्या खाली त्यांना वैशाख पौर्णिमेला ज्ञानाची प्राप्ती झाली होती. त्यानंतर त्यांना बुद्ध म्हटले जाऊ लागले.बुद्ध या शब्दाचा अर्थ जो जागृत आहे आणि ज्ञान संपन्न आहे. बुद्धाने त्यांच्या अनुयायांना जे शिक्षण दिले ते सर्वांच्या कल्याणाकारी आहे. मग तो कोणत्याही धर्माचा असो. कोणत्याही धर्माचा अनुयायी भगवान बुद्धाच्या उपदेशांच्या अनुकरण करुन आपल्या जीवनास आणखी चांगले करु शकतो.

आज आपण गौतम बुद्ध यांच्या काही महत्वाच्या विचारांना वाचणार आहोत. या विचारांना अनुसरुन कोणीही स्वत:चे कल्याण करु शकतो. एवढंच नव्हे तर, तुम्ही बदलाची एक नवीन अवस्था प्राप्त कराल आणि जीवनातील सर्व बंधनांपासून मुक्त व्हाल.’दुःख’ हे जीवनाचे सर्वात मोठे सत्य आहे आणि गौतम बुद्धांच्या शिक्षणाचा मुख्य उद्देश या दुःखातून मुक्ती मिळवणे हा आहे. आसक्ती आणि तृष्णा हे दु:खाचे मोठे कारण आहे असे गौतम बुद्धांनी सांगितले होते.

1.’तीन गोष्टी जास्त काळ लपू शकत नाहीत – सुर्य, चंद्र आणि सत्य’

2.’हजारो पोकळ शब्दांपेक्षा चांगला तो शब्द जो, शांतता आणेल’

3. ‘आरोग्य सर्वात मोठी देणगी आहे. समाधान सर्वात मोठी संपत्ती आणि ईमानदारी सर्वात मोठे नाते आहे.’

4.’मी कधीच हे पाहात नाही काय केले आहे. मी नेहमी पाहतो की काय केले जाणे शिल्लक आहे.’

 

5. ‘वाईट गोष्टी हव्यात म्हणजे चांगल्या गोष्टी त्यावर आपली पवित्रता सिद्ध करु शकतील.’

6.’सर्वात काळोखी रात्र अज्ञानता आहे.’

7. ‘शांतता आतून येते, तिला बाहेर शोधू नका.’

8.’शरीराला आरोग्यदायी बनवणे आपले कर्तव्य आहे. अन्यथा आपण आपले मन मजबूत आणि स्पष्ट राखू शकणार नाही.’

9. ‘जसे विचार तुम्ही करता. तसे तुम्ही बनता.’

10. ‘मुक्कामी पोहचण्यापेक्षाही प्रवास योग्य होणे गरजेचे असते.’

 

Follow Us