AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

24 जीबीपर्यंत रॅम आणि 100 वॅट फास्ट चार्जिंगसह रेडमी टर्बो 5 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि उपलब्धता

नवीन फोन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी रेडमी टर्बो 5 लाँच करण्यात आला आहे. हा फोन 12 जीबी व्हर्च्युअल रॅम, अल्ट्रा प्रोसेसर आणि 7540mAh बॅटरी यांसारख्या अनेक प्रभावी वैशिष्ट्यांसह येतो. चला तर मग या फोनची किंमत जाणून घेऊयात.

24 जीबीपर्यंत रॅम आणि 100 वॅट फास्ट चार्जिंगसह रेडमी टर्बो 5 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि उपलब्धता
Redmi Turbo 5 Launch in India
| Edited By: | Updated on: Jun 18, 2026 | 1:54 AM
Share

रेडमी कंपनीचा नवीन रेडमी टर्बो 5 हा स्मार्टफोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. मीडियाटेक डायमेन्सिटी 8000 सिरीजच्या ऑक्टा-कोर प्रोसेसरवर चालणाऱ्या या फोनमध्ये पॉवरफूल 7540mAh बॅटरी, 50-मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप, 1.5K AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. चला तर मग भारतात लाँच झालेल्या रेडमी टर्बो 5 ची किंमत किती आहे ते जाणून घेऊयात.

भारतात रेडमी टर्बो 5 ची किंमत

हा नवीन रेडमी स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यामध्ये 8GB रॅम आणि 256GB व्हेरिएंटची किंमत 37 हजार 999 रूपये आहे. तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या टॉप व्हेरिएंटची किंमत 40 हजार 999 रूपये आहे. याशिवाय तुम्ही हा फोन खरेदी करताना SBI, ICICI आणि Axis Bank कार्ड वापरून पेमेंट केल्यास 2,000 रूपयांपर्यंतच्या सवलतीचा लाभ मिळेल, ज्यामुळे 8GB व्हेरिएंट 35 हजार 999 रूपयांमध्ये आणि 12GB व्हेरिएंट 38 हजार 999 रूपयांमध्ये उपलब्ध होईल. या फोनची विक्री 19 जूनपासून Mi.com, Amazon आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवर सुरू होईल.

रेडमी टर्बो 5 ची वैशिष्ट्ये

ओएस: हा ड्युअल-सिम फोन अँड्रॉइड 16 वर आधारित हायपरओएस 3 वर चालतो. कंपनी चार वर्षांचे ओएस अपग्रेड आणि सहा वर्षांचे सुरक्षा अपडेट्स देण्याचे आश्वासन देते.

डिस्प्ले: या रेडमी फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह 1.5K रिझोल्यूशनची स्क्रीन आहे. 6.59-इंचाचा 12-बिट AMOLED डिस्प्ले असलेल्या या फोनमध्ये 3500 निट्सची पीक ब्राइटनेस, 2560Hz टच सॅम्पलिंग रेट आणि स्क्रीनच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिला ग्लास 7i आहे.

प्रोसेसर: तुम्हाला हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 8500 अल्ट्रा प्रोसेसरसह मिळेल.

रॅम: या फोनमध्ये 8 जीबी आणि 12 जीबी असे दोन रॅम पर्याय आहेत, पण या फोनमध्ये 12 जीबी व्हर्च्युअल रॅम देखील आहे.

कॅमेरा: या फोनमध्ये मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल सेन्सर आहे. सेल्फीसाठी 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरादेखील उपलब्ध आहे.

बॅटरी: यामध्ये 7540mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, हा फोन 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध असेल.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!