Health | पुदिना आणि तुळशीच्या पानांचे अशाप्रकारे सेवन करा आणि वाढलेले वजन झपाट्याने कमी करा!

| Updated on: May 14, 2022 | 4:04 PM

अनेक खाद्यपदार्थांमध्ये पुदिन्याचा वापर केला जातो. पुदिना हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, त्यामुळे लोक खाद्यपदार्थांमध्ये पुदिन्याचे सेवन करतात. विशेषत: उन्हाळ्यात लोक आहारात पुदिन्याच्या पानांचा समावेश करतात. पुदिन्याच्या पाण्याने तुम्ही तुमचे वाढलेले वजन झटपट कमी करू शकता. वाढलेले वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी पुदिन्याची पाने गरम पाण्यामध्ये उकळून घ्या.

Health | पुदिना आणि तुळशीच्या पानांचे अशाप्रकारे सेवन करा आणि वाढलेले वजन झपाट्याने कमी करा!
Image Credit source: unsplash.com
Follow us on

मुंबई : आपल्यापैकी अनेकांना वाढलेले वजन कमी (Weight loss) करायचे आहे. मात्र, सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये वजन कमी करण्यासाठी व्यायाम किंवा डाएटसाठी आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये. कारण सकाळी 7 ला आॅफिससाठी (Office) निघावे लागते आणि थेट रात्री घरी येण्यासाठी 9 पेक्षाही अधिक टाईम होतो. दिवसभरातील आॅफिसमध्ये कामाचा तणाव यामुळे आल्यानंतर कोणालाही जिमला किंवा इतर व्यायाम करायला अजिबात जाऊ वाढत नाही. परिणामी वजन झपाट्याने वाढण्यास सुरूवात होते. एकदा जर वजन वाढण्यास सुरूवात झाली तर आरोग्याच्या अनेक समस्या (Problem) निर्माण होण्यास सुरूवात होते. मात्र, वजन कमी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आपण व्यायाम न करता काही खास पेयांचा आहारामध्ये समावेश करून देखील वजन कमी करू शकतो.

पुदिना

अनेक खाद्यपदार्थांमध्ये पुदिन्याचा वापर केला जातो. पुदिना हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, त्यामुळे लोक खाद्यपदार्थांमध्ये पुदिन्याचे सेवन करतात. विशेषत: उन्हाळ्यात लोक आहारात पुदिन्याच्या पानांचा समावेश करतात. पुदिन्याच्या पाण्याने तुम्ही तुमचे वाढलेले वजन झटपट कमी करू शकता. वाढलेले वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी पुदिन्याची पाने गरम पाण्यामध्ये उकळून घ्या आणि ते पाणी प्या. यामुळे आपल्या शरीरावरील चरबी बर्न होण्यास मदत होते.

हे सुद्धा वाचा

तुळशी

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, तुळस आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. विशेष म्हणजे तुळस वजन कमी करण्यास मदत करते. वजन कमी करण्यासाठी तुळशीची पाने एक ग्लास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर हे पाणी कोमट करून प्या. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. दररोज सकाळी तुळशीचे पाने भिजवलेले पाणी पिल्याने तुम्ही तणावमुक्त राहू शकता. कारण तुळसमध्ये हार्मोन्स कोर्टिसोल असते ज्यामुळे ताण कमी होतो. तुळशीचे पाणी पिल्याने चिंता आणि नैराश्य कमी होते.