AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारळाचे पाणी की लिंबाचा रस, उन्हाळ्यात पिण्यासाठी कोणते आहे अधिक फायदेशीर जाणून घ्या

उन्हाळ्यात नारळाचे पाणी आणि लिंबाचा रस ही उत्तम पेये आहेत. पण तुम्हाला माहित आहे का या दोन्हींपैकी अधिक फायदेशीर कोणते आहे? चला आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.

नारळाचे पाणी की लिंबाचा रस, उन्हाळ्यात पिण्यासाठी कोणते आहे अधिक फायदेशीर जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Mar 20, 2026 | 3:38 PM
Share

उन्हाळा सुरु झाला की शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी केवळ साधे पाणीच नव्हे तर नारळाचे पाणी आणि इतर अनेक पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी लिंबाच्या पाण्याचाही सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. त्याचबरोबर नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते उन्हाळ्यासाठी एक उत्तम पेय मानले जाते. आता प्रश्न असा आहे की या दोन्ही पेयांपैकी उन्हाळ्यात अधिक फायदेशीर कोणते आहे? बहुतेक लोकं नारळाच्या पाण्याऐवजी लिंबाच्या पाण्याला पसंती देतात. मात्र शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी नारळाचे पाणी हा देखील एक उत्तम पर्याय आहे.

ज्येष्ठ आहारतज्ञ यांनी सांगितले आहे की उन्हाळ्यात नारळाचे पाणी प्यावे की लिंबाचे पाणी, यापैकी कोणते पेय पिणे अधिक चांगले आहे. तसेच त्यातील घटक, ते कसे प्यावे आणि त्याचे फायदे याबद्दलही जाणून घेऊयात.

नारळाच्या पाण्यातील घटक

उन्हाळ्यात नारळपाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यातील इलेक्ट्रोलाइट्सचे गुणधर्म. या फायद्यामुळे कडक उन्हात देखील दिवसभर शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते. नारळपाण्यात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सोडियमसारखे घटकही असतात. हे सर्व घटक शरीरातील द्रवांचे संतुलन राखण्यापासून ते स्नायू तयार करण्यापर्यंत अनेक फायदे देतात. नारळपाण्यात नैसर्गिक साखर असते, पण ते कमी कॅलरीयुक्त पेय असल्यामुळे वजन नियंत्रणासाठी एक उत्तम पेय ठरते. त्यात कर्बोदकेही असतात आणि हे नारळ पाणी प्यायल्याने त्वरित ऊर्जा मिळते.

लिंबू सरबताचे घटक

लिंबूपाण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यातील व्हिटॅमिन सी. या स्वस्त आणि घरगुती पेयात इतरही अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्येष्ठ आहारतज्ञ सांगतात की व्हिटॅमिन सी केवळ रोगप्रतिकारशक्तीच मजबूत करत नाही, तर उन्हामुळे त्वचेचं संरक्षण करते. लिंबामध्ये अल्कधर्मी गुणधर्म असतात, त्यामुळे ते आपल्या शरीरातील पीएच पातळी संतुलित ठेवते. तसेच हे एक कमी कॅलरी असलेले पेय आहे.

लिंबाचं पाणी की नारळाचं पाणी उन्हाळ्यात अधिक फायदेशीर काय आहे?

ज्येष्ठ आहारतज्ञ यांच्या मते दोन्ही पेयं आपापल्या परीने फायदेशीर आहेत. नारळाच्या पाण्यात नैसर्गिकरित्या इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात आणि ते डिहायड्रेशन, अशक्तपणा व उष्माघातातून लवकर बरे होण्यास मदत करते. दुसरीकडे लिंबाच्या सरबतामध्ये व्हिटॅमिन सी मिळते आणि हे शरीराला ताजेतवाने करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त पचनक्रिया देखील सुधारते.

तज्ज्ञ पुढे सांगतात की तीव्र उष्णता किंवा जास्त घाम येत असताना नारळाच्या पाण्यामुळे इलेक्ट्रोलाइट्सचा चांगला पुरवठा होतो. दररोज शरीरातील पाण्याचे प्रमाण राखण्यासाठी लिंबु सरबत देखील प्रभावी आहे. त्यामुळे हे दोन्ही पेयांचा तुमच्या आहारात समावेश करावा.

हे दोन्ही पेय पिण्याच्या योग्य वेळेबद्दल बोलायचे झाले तर तज्ज्ञ गीतिका यांच्या मते, ते रिकाम्या पोटी किंवा सकाळच्या मधल्या वेळेत पिणे सर्वोत्तम आहे. त्यांच्या मते दिवसाची सुरुवात नारळाच्या पाण्याने केल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. इतकेच नाही, तर उन्हाळ्यात उष्माघाताच्या धोक्यांपासून शरीराचे संरक्षण करण्यासही ते मदत करते.

तज्ज्ञांच्या मते, तुम्ही दुपारनंतरही डिटॉक्स ड्रिंक्स पिऊ शकता. त्यांच्या मते, उन्हाळ्यातील दुपारच्या उष्णतेनंतर शरीराला थंडावा आणि इलेक्ट्रोलाइट्सची गरज असते. या वेळी नारळाचे पाणी, आवळ्याचे पाणी, पुदिना-लिंबू पाणी किंवा सब्जा ड्रिंक्सचे सेवन केले जाऊ शकते. यामुळे तुमचे शरीर हायड्रेशन आणि खनिजांचे संतुलन राखू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत