Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुळशीला पाणी देताना या चुका करु नका, अन्यथा बिघडेल घराची शांतता

आपल्या हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. असे म्हटले जाते की ज्या घरात दररोज तुळशीची पूजा केली जाते, त्या घरात सुख, समृद्धी आणि समृद्धी येते.

तुळशीला पाणी देताना या चुका करु नका, अन्यथा बिघडेल घराची शांतता
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 8:13 PM

आपल्या हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. असे म्हटले जाते की ज्या घरात दररोज तुळशीची पूजा केली जाते, त्या घरात सुख, समृद्धी येते. त्याचबरोबरआपल्या सगळ्यांना माहीतच आहे की भगवान विष्णूला तुळस अत्यंत प्रिय आहे. तुळशीशिवाय भगवान नारायणाची पूजा आणि नैवैद्य अपूर्ण मानला जातो. तसेच दररोज सकाळी तुळशीमध्ये पाणी देऊन संध्याकाळी तुळशीमध्ये दिवा लावल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो. परंतु तुळशीची पूजा करताना या चुका करणे टाळावे अन्यथा पूजेचे योग्य फळ मिळणार नाही. चला तर मग जाणून घेऊया तुळशीत पाणी देताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.

तुळशीला पाणी देण्याची योग्य वेळ

तुळशीला नेहमी सूर्योदयाच्या वेळी म्हणजेच सकाळी पाणी द्यावे. हा काळ उत्तम आणि फलदायी मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी दिल्यास शुभ फळ मिळते. घरात पैश्यांसंबंधित कोणतीही समस्या असल्यास त्या ही दूर होतात.

या दिवशी तुळशीत पाणी अर्पण करू नका

जर तुमच्या घरात तुळस असेल तर तुम्ही रोज पाणी घालावे. परंतु रविवार, एकादशीला तुळशीमध्ये पाणी अर्पण करू नये. एकादशीच्या दिवशी तुळशी माता पाण्याविना उपवास करते आणि जल अर्पण केल्याने तिचे व्रत मोडले जाऊ शकते. एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण केल्याने जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात.

हे सुद्धा वाचा

दिशा लक्षात ठेवा

जर तुम्ही तुमच्या घरात तुळशीचे रोप लावत असाल तर दिशेची विशेष काळजी घ्या. चुकूनही दक्षिण दिशेला तुळशीचे रोप ठेऊ नये. असे म्हटले जाते की तुळस दक्षिण दिशेला ठेवल्यास घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.

तुळशीला पाणी देण्यासाठी योग्य नियम

तुळशीत जास्त प्रमाणात पाणी देऊ नये. असे केल्याने तुळशीच्या रोपांची मुळे खराब होऊ लागतात आणि तुळशीचे रोप लवकर कोरडे पडू लागते. असे म्हणतात की सुकलेले तुळशीचे रोप चांगले नाही.

महिलांनी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात

तुळशी मातेची पूजा करताना महिलांनी केस सुटे ठेवू नयेत. महिलांनी नेहमी केस बांधून तुळशीची पूजा करावी. असे केल्याने शुभ फलप्राप्ती होते.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.