AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चपात्या केल्यानंतर उरलेली कणिक फ्रिजमध्ये ठेवताय? आजारांना आमंत्रणच, पोटाच्या समस्या वाढू शकतात

रात्री पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवणे किंवा उरलेली कणिक फ्रिजमध्ये ठेवणे हा वेळ वाचवण्याचा एक शॉर्टकट असला तरी आरोग्याला हानीकारक ठरू शकतो. तसेच ते आजाराला आमंत्रणही असते. कसे ते पाहुया.

चपात्या केल्यानंतर उरलेली कणिक फ्रिजमध्ये ठेवताय? आजारांना आमंत्रणच, पोटाच्या समस्या वाढू शकतात
Refrigerated dough harmful for healthImage Credit source: Meta AI
Updated on: Jun 16, 2025 | 7:58 PM
Share

आजकालच्या धावपळीच्या जगात सगळ्या कामांसाठी वेळ देणे जरा कठीणच असते. त्यामुळे मल्टीटास्कींग हाच एक पर्याय असतो. त्यात महिलांना जर घरातील कामे करून ऑफिसही असेल तर मात्र त्यांची सर्वात जास्त धावपळ होते. अशा वेळी त्या शॉर्टकट पद्धतींचा अवलंब करतात आणि पटापट काम आवरण्याचं पाहतात. त्यातील एक पद्धत म्हणजे पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवणे.

रात्री पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवणे वेळ वाचण्यासाठी असले तरी आरोग्यासाठी खूप हानिकारक

बऱ्याचदा अनेक घरांमध्ये रात्री पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवले जाते किंवा चपत्या झाल्यानंतर उरलेली कणिक फ्रिजमध्ये ठेवली जाते. आणि नंतर ती बाहेर काढून मग पोळ्या किंवा चपात्या बनवल्या जातात. असे केल्याने वेळ वाचतो, परंतु आरोग्यासाठी ते किती हानिकारक आहे याची कल्पना कदाचित बऱ्याच जणांना नसते. फ्रिजमध्ये ठेवलेल्या किंवा मळलेल्या कणकेपासून बनवलेल्या चपात्या जास्त काळ खाणे आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते. मळलेले पीठ फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर त्यात रसायने तयार होऊ लागतात जी हानिकारक असतात. चला जाणून घेऊया फ्रिजमध्ये ठेवलेले पीठ आरोग्याला कसे हानिकारक असते ते.

तुम्ही किती वेळ मळलेले पीठ ठेवू शकता?

पोटदुखी

बराच काळ साठवलेल्या पिठापासून बनवलेल्या चपात्या खाल्ल्याने पोटदुखी किंवा पोट खराब होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

आम्लता

मळलेले पीठ साठवल्याने मायकोटॉक्सिन होतात ज्यामुळे आम्लतेची समस्या उद्भवू शकते

पोषणाचा अभाव

मळलेले पीठ फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यात पोषणाची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे शरीरालाही काहीही पोषण मिळत नाही. म्हणून, ताज्या पीठापासून बनवलेल्या चपात्या खाण्याचा प्रयत्न करा

अन्न विषबाधा

रेफ्रिजरेटरमध्ये जास्त काळ ठेवलेल्या पिठापासून बनवलेल्या चपात्या खाल्ल्यानेही विषबाधेची समस्या उद्भवू शकते.

कणिक किती वेळ ठेवावी?

जर तुम्हाला पीठ मळून ठेवायचंच असेल तर तुम्ही ते 2 ते 3 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता. जर तुम्हाला खूप गरज असेल तर तुम्ही 6 ते 7 तासांसाठी ठेवू शकता. पण तरी देखील ताजे पीठ वापरण्याचा प्रयत्न करा. किंवा तुम्हाला अगदीच एखाद्या वेळी घाई आहे  तर पिठ मळून झाल्यानंतर त्या कणकेला तेल किंवा तूप लावून हवाबंद डब्यात ठेवा. आणि शक्यतो काचेचा डबा किंवा कंटेनर वापरता आलं तर उत्तम.

एकनाथ शिंदेंचं नाव सुवर्णाक्षरात का कोरलं जाणार?
एकनाथ शिंदेंचं नाव सुवर्णाक्षरात का कोरलं जाणार?.
गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर
गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर.
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा.
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा.
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले..
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले...
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा.
राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?
राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?.
मातोश्रीवर शकुनी मामा बसलेला आहे; नितेश राणे ठाकरे बंधूंवर बरसले
मातोश्रीवर शकुनी मामा बसलेला आहे; नितेश राणे ठाकरे बंधूंवर बरसले.
खळ्ळखट्याकची भाषा वापरताच मुनगंटीवारांनी काढले राज ठाकरेंचे संस्कार
खळ्ळखट्याकची भाषा वापरताच मुनगंटीवारांनी काढले राज ठाकरेंचे संस्कार.
दाऊदला देखील पक्ष प्रवेश मिळेल; संजय राऊतांची फटकेबाजी
दाऊदला देखील पक्ष प्रवेश मिळेल; संजय राऊतांची फटकेबाजी.