AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसभरातून किती कप चहा प्यायला पाहिजे?

चहावर प्रेम करणारे बहुतेक लोक याची काळजी घेत नाहीत की त्याचे जास्त सेवन केल्याने आरोग्याचे मोठे नुकसान होऊ शकते. अशावेळी हा चहा पिण्याची मर्यादा काय आहे, हे जाणून घेणं गरजेचं आहे.

दिवसभरातून किती कप चहा प्यायला पाहिजे?
how many cup of tea in a dayImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Feb 19, 2023 | 5:05 PM
Share

भारतातच नाही तर जगभरात चहाप्रेमी आपल्याला सापडतील, आपल्यापैकी अनेक जण असे आहेत ज्यांना सकाळी चहा पिण्याची सवय आहे. या लोकांची दिवसभरात अनेक कप चहा प्यायलाही हरकत नसते. ऑफिसमध्ये चहा पिण्याबद्दल विचारलं तर ‘नाही’ म्हणावंसं वाटत नाही. मात्र, चहावर प्रेम करणारे बहुतेक लोक याची काळजी घेत नाहीत की त्याचे जास्त सेवन केल्याने आरोग्याचे मोठे नुकसान होऊ शकते. अशावेळी हा चहा पिण्याची मर्यादा काय आहे, हे जाणून घेणं गरजेचं आहे.

चहामध्ये कॅफिन आणि साखर असते, हे दोन्ही आरोग्यासाठी चांगले मानले जात नाहीत. जर तुम्ही दिवसातून 5 ते 10 कप चहा पित असाल तर कुठेतरी तुम्ही स्वत:चं नुकसान करत आहात, त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

चहा प्यायल्याने नुकसान होते असे नाही, हे पेय शतकानुशतके पारंपारिक औषधांमध्ये वापरले जात आहे, हे आपल्याला ताजेतवाने करण्यास आणि तणाव दूर करण्यास मदत करते, परंतु जर आपण एका मर्यादेपेक्षा जास्त चहा पिला तर बद्धकोष्ठता, छातीत जळजळ, आतड्यांवर वाईट परिणाम, आम्लपित्त, उच्च रक्तदाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

भारतात चहामध्ये साखर मिसळण्याचा ट्रेंड खूप जास्त आहे आणि दिवसभरात अनेक कप चहा प्यायल्यास साखरेचे सेवन वाढणार हे उघड आहे. अशावेळी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढेल आणि मग मधुमेहाचा धोका निर्माण होऊ शकतो.

आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित आहे की जास्त साखर खाल्ल्याने साखरेचे चरबीमध्ये रूपांतर होऊ लागते, ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि मग पोटाभोवती चरबी येते. अशा वेळी वजन कमी करणे अवघड होऊन बसते.

चहामध्ये कॅफिन भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे ताजेपणा मिळतो, पण तुम्हाला पुन्हा चहाचे व्यसन लागते आणि ज्या दिवशी तुम्ही या पेयाचे सेवन केले नाही, त्या दिवशी तुम्हाला अस्वस्थता आणि डोकेदुखीला सामोरे जावे लागू शकते. चहामुळे झोपही निघून जाते, त्यामुळे तुमच्या झोपण्याच्या पद्धतीवर वाईट परिणाम होऊ शकतो.

दिवसभरात किती कप चहा प्यावा, असा प्रश्नही तुमच्या मनात निर्माण होत असेल तर तुम्ही दररोज 2-3 कप चहा पिऊ शकता, तेही मर्यादित प्रमाणात साखरेने. ज्यांना या सवयीवर नियंत्रण ठेवता येत नाही त्यांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

Follow Us
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा