AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu dosh : रात्री झोपताना उशी खाली ठेवा या गोष्टी, अनेक समस्यांपासून मिळते मुक्ती

Vastu Tips ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की पितृदोष किंवा ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी ज्योतिषशास्त्रात सांगितलेले काही उपाय करून पाहिल्यास व्यक्तीला आर्थिक समस्यांपासून तर घरगुती त्रासातूनही आराम मिळतो.

Vastu dosh : रात्री झोपताना उशी खाली ठेवा या गोष्टी, अनेक समस्यांपासून मिळते मुक्ती
| Updated on: Dec 23, 2023 | 3:55 PM
Share

Vastudosh : ज्योतिषशास्त्रात वेगवेगळ्या समस्यांवर वेगवेगळे उपाय सुचवले आहेत. जे एखाद्या समस्यापासून मुक्त करु शकतात. ज्योतिष शास्त्रामध्ये असे मानले जाते की उशीखाली काही वस्तू ठेवून झोपल्याने व्यक्ती जीवनातील मोठ्या समस्यांपासून मुक्ती मिळवते. अशा स्थितीत चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत.

नकारात्मक उर्जेपासून मुक्ती

एका कापडात थोडी बडीशेप बांधून रात्री झोपण्यापूर्वी ते उशीखाली ठेवा. याच्या मदतीने व्यक्तीला अनेक प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळू शकते. यासोबतच भयानक स्वप्नांची समस्याही दूर होते आणि व्यक्तीला चांगली झोप लागते. असे मानले जाते की बडीशेप दररोज उशाखाली ठेवल्यास नकारात्मक उर्जेपासून मुक्त होण्यास मदत होते.

भयानक स्वप्नांपासून मुक्ती

अनेकांना रात्री भयानक स्वप्ने पडण्याची समस्या असते. ज्यामुळे त्यांना नीट झोप येत नाही. अशा स्थितीत व्यक्तीने झोपताना उशीखाली लसणाच्या पाकळ्या ठेवाव्यात. असे केल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार कायम राहतो. तसेच, व्यक्तीला शांतपणे झोप लागते.

वाईट नजरेपासून संरक्षण

तुम्ही दररोज उशीखाली कापूर ठेवून झोपत असाल तर घरातील वास्तुदोषांपासून मुक्ती मिळू शकते. याशिवाय वाईट नजरेपासूनही या उपायाने संरक्षण मिळू शकते. ज्योतिष शास्त्रानुसार उशीखाली कापूर ठेवल्याने व्यक्तीला नकारात्मक उर्जेपासून मुक्ती मिळते.

अस्वीकरण: ‘या लेखात दिलेली माहिती विश्वासार्हतेची हमी देत नाही. ही माहिती विविध ज्योतिषशास्त्रातील माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. कोणत्याही समस्येसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....