AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येक शुभ कार्यापूर्वी आपण दही आणि साखर का खातो? आहे खास कारण

कोणतेही शुभ कार्य करण्याआधी हातावर दही-साखर देण्याची आपल्याकडे परंपरा आहे. पण त्यामागे अध्यात्म, परंपरा-प्रथांसोबतच आणखीही काही कारणे आहेत जी अनेकांना माहित नसतील. चला जाणून घेऊयात यामागे काय कारणे आहेत ते.

प्रत्येक शुभ कार्यापूर्वी आपण दही आणि साखर का खातो? आहे खास कारण
Why is curd and sugar eaten before auspicious occasionsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 17, 2025 | 5:05 PM
Share

भारतीय परंपरांमध्ये अशा अनेक प्रथा आहेत ज्या पिढ्यानपिढ्या चालत आल्या आहेत. त्या प्रथा आजही आपण मानतो. त्यापैकी एक म्हणजे कोणत्याही शुभ कार्यासाठी बाहेर जाण्यापूर्वी हातावर दही आणि साखर घेणे किंवा एखाद्या व्यक्तिच्या हातावर दही-साखर ठेवून त्याला ते खायला देणे.

लहानपणापासून आपण सर्वांनी पाहिले आहे की आपल्याला परीक्षेला जायचे असलं किंवा मग मुलाखतीला जायचे असलं किंवा कोणतही शुभ कार्य असेल तर, तेव्हा घरातील वडीलधारी लोक आपल्या हातावर दही आणि साखर ठेवायची. ही प्रथा शुभ असते एवढंच सांगितलं जातं. पण खरंच कोणत्याही शुभ कार्यापूर्वी दही-साखर का खायला देतात कधी विचार केला का? चला जाणून घेऊयात काय कारण आहे ते.

शुभ कार्याच्या सुरुवातीला दही साखर खायला  का देतात?

दही आणि साखर खाणे हे केवळ परंपरेशी संबंधित नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. म्हणूनच लोक प्रत्येक शुभ कार्याच्या सुरुवातीला दही साखर खायला देतात. आजही ही परंपरा प्रत्येक घरात पाळली जाते.

अध्यात्म काय सांगतं?

दह्याला पंचामृत मानलं जातं, त्यामुळे प्रत्येक शुभ कार्यात त्याचा आवर्जून वापर करतात. ज्योतिषशास्त्रात दह्याचा संबंध चंद्राशी असल्याचं सांगितलंय. दह्याचा रंग पांढरा असल्यामुळे चंद्राला ते प्रचंड आवडतं. म्हणूनच ग्रहणात अनेक भागात दह्याचे पदार्थ बनवले जातात. किंवा दही साखर दिलं जातं.

आरोग्याच्या दृष्टीने दही साखर खाण्याचे काय फायदे आहेत

त्वरित ऊर्जा प्रदान करते

दही आणि साखर आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. हे खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते, कारण आपल्याला साखरेतून ग्लुकोज आणि दह्यापासून प्रथिने मिळतात . घराबाहेर पडण्यापूर्वी हे खाल्ल्याने तुम्ही दिवसभराच्या कामासाठी तयार होता. तुम्हाला उर्जेची कमतरता भासत नाही.

पचनक्रिया व्यवस्थित राहते

दह्यामध्ये अनेक चांगले बॅक्टेरिया आढळतात जे आपले पोट आणि पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करतात. यामुळे पोट खराब होण्याचा धोका कमी होतो. विशेषतः जेव्हा तुम्ही बाहेर जात असाल तेव्हा हे लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे.

शरीर हायड्रेटेड राहते

घराबाहेर पडताना तुम्हाला दही आणि साखर दिली जाते कारण ते तुमचे शरीर हायड्रेट ठेवते आणि तुम्हाला ताजेतवाने वाटते. याशिवाय, तुम्ही सक्रिय राहता.

उष्णतेपासून रक्षण होते

सुरुवातीपासूनच आपल्या सर्वांना सांगण्यात आले आहे की उन्हाळ्यात दही खाल्ल्याने आपले शरीर थंड होते. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा उष्माघाताचा धोका कमी करण्यासाठी दही आणि साखर खाणे म्हणजे उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करण्याचा हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. अशा परिस्थितीत, बाहेर गेल्यावर आजारी पडण्याची शक्यता देखील कमी होते.

ताण कमी होतो

काही कामासाठी बाहेर गेल्यावर अनेक लोक तणावात येतात. विशेषतः जेव्हा त्यांना परीक्षा किंवा मुलाखत द्यायची असते. अशा परिस्थितीत दही आणि साखर खाल्ल्याने मन शांत होते. त्याची गोड चव मनाला शांत करते. त्यामुळे आत्मविश्वासही वाढतो.

शुभ मानले जाते

दही आणि साखर खाणे हे केवळ आरोग्यासाठीच नाही तर आपल्या संस्कृतीतही शुभ मानले जाते. घराबाहेर पडण्यापूर्वी गोड पदार्थ खाल्ल्यास सर्व काम व्यवस्थित होते असे म्हटले जाते.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.