AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समृद्धी महामार्गावरील अपघात घटले, आरटीओच्या उपाययोजनांना असे आले यश

समृद्धी महामार्गावर नागपूर ते नाशिक दरम्यान आरटीओने 24 तास इंटरसेप्टर वाहनांद्वारे बेफामपणे वाहने चालविणाऱ्यांवर स्पीड गनद्वारे लक्ष ठेवून कारवाई केली आहे. बेशिस्त वाहनचालकांकडून एकूण 33,56,205 रुपयांचा दंड वसुल केला आहे.

समृद्धी महामार्गावरील अपघात घटले, आरटीओच्या उपाययोजनांना असे आले यश
rto action Samriddhi Highway
| Updated on: Oct 02, 2024 | 2:45 PM
Share

मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गावरील अपघातामुळे चिंता व्यक्त केली जात होती. राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस हायवेवरील अपघाताने आरटीओने या महामार्गावरील गस्त वाढवून वाहनांना शिस्त लावण्यासाठी गेली दोन वर्षे उपाययोजना केल्या त्याला आता हळूहळू यश येत आहे.जानेवारी ते ऑगस्ट 2023 या आठ महिन्यात समृद्धी महामार्गावर 63 प्राणांकित अपघातात 120 जणांचा बळी गेला होता. यंदाच्या जानेवारी ते ऑगस्ट 2024 मध्ये 57 प्राणांकित अपघातात 80 जणांचा बळी गेला आहे. म्हणजे अपघातात 10 टक्के कमतरता झाली आहे. तर एकूण अपघाताच्या संख्येत 19 टक्के घट झाली आहे.

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर साल 2023 मध्ये 81 प्राणांकित अपघातात 151 जणांचे प्राण गेले. तर गंभीर जखमी करणारे 17 अपघात घडले असून त्यात 42 जण गंभीर जखमी झाले. तर किरकोळ जखमी असणारे 22 अपघात घडले असून 52 जण किरकोळ जखमी झाले. तर 14 अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. असे साल 2023 मध्ये 134 अपघात घडले असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.

जानेवारी ते ऑगस्ट 2023 या काळात 63 प्राणांकित अपघात घडले असून त्यात 120 जणांचा मृत्यू झाला. तर याच आठ महिन्याच्या काळात 17 गंभीर जखमी करणारे अपघात घडले असून यात 30 जण जखमी झाले. तर किरकोळ जखमा होणारे 20 अपघात घडले असून यात 40 जण किरकोळ जखमी झाले आहेत. तर आठ अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. अशा प्रकारे आठ महिन्यात गेल्या वर्षी एकूण 103 अपघात घडले.

तर यंदाच्या जानेवारी ते ऑगस्ट 2024 या आठ महिन्याच्या काळात अपघाताची संख्या घटली असून या काळात 57 अपघात घडले असून त्यात 80 जण जखमी झाले आहेत. म्हणजे प्राणांकित अपघाताची संख्या 10 टक्के घटली आहे. तर 15 गंभीर जखमी होणारे अपघात घडले असून त्यात 39 जण गंभीर जखमी झाले आहेत. म्हणजे गंभीर अपघाताच्या संख्येत 25 टक्के तर गंभीर जखमींच्या संख्येत 30 टक्के कमी झाली आहे.

तर किरकोळ जखमी होणारे 8 अपघात घडले असून त्यात 17 जण किरकोळ जखमी झाले आहेत. किरकोळ जखमी अपघातांच्या संख्येत 60 टक्के घट झाली असून किरकोळ जखमीच्या संख्येत 58 टक्के घट झाली आहे.तर 3 अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. असे एकूण 83अपघात घडले आहेत. कोणीही जखमी न होणाऱ्या अपघाताच्या संख्येत 63 टक्के घट झाली आहे. तर एकूण अपघाताच्या संख्येत 19 टक्के घट झाली आहे.

अशी झाली कारवाई –

नाशिक ते नागपूर या मार्गावर 24×7 आठ इंटरसेप्टर व्हेईकल तैनात करण्यात आले आहे. ओव्हर स्पीडींग वाहनांवर देखरेख ठेवण्यासाठी लेसर गनचा वापर करण्यात आला. सर्व बस चालकांची ड्रंक एण्ड ड्रायव्हींग मोहीमेत ब्रेथ अनालायझर टेस्ट करण्यात आली. ट्रेड गेज मशिनद्वारे टायरची तपासणी करण्यात आली. अनफिट व्हेइकलची तपासणी करण्यात आली तर लेनची शिस्त न पाळणाऱ्यांवर देखील कारवाई केली गेली. ओव्हर स्पीडींग ड्रायव्हरना टोल प्लाझा येथे काऊन्सिलिंग करण्यात आले.

समृद्धी महामार्गावर 1,03,261 टायर तपासणी, 1,564 रेफलेक्टींग टेप, 18,776 बस आणि 24,008 मालवाहतूक चालकाची ब्रेथ एनालायझरची टेस्ट करण्यात आली. त्यात 109 बसचालक आणि 53 अवजड चालक दोषी सापडले. 3,879 ड्रायव्हरचे काऊन्सिलिंग केले गेले. अशा या कारवाईत एकूण 33,56,205 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.