AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोरगरीबांची विठ्ठल रखुमाई ‘जमीनदार’, पण अर्ध्या अधिक जमीनीवर डल्ला? वाचा सविस्तर

महाराष्ट्राच्या लाखो भक्तांचं प्रेरणास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईच्या नावे राज्यभरात अडीच एकर जमीन असल्याची माहिती समोर आली आहे (25 hunder acres of land on vitthala's name of Pandharpur).

गोरगरीबांची विठ्ठल रखुमाई 'जमीनदार', पण अर्ध्या अधिक जमीनीवर डल्ला? वाचा सविस्तर
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Feb 01, 2021 | 6:32 PM
Share

पंढरपूर (सोलापूर) : महाराष्ट्राच्या लाखो भक्तांचं प्रेरणास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईच्या नावे राज्यभरात अडीच एकर जमीन असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 1 हजार 21 एकर जमीन सध्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या ताब्यात आली आहे. मंदिर समितीने कोरोना काळात यातील दोनशे एकर जमीन ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. उर्वरित जमीन मिळवण्यासाठी समितीकडून प्रयत्न सुरू आहेत (25 hunder acres of land on vitthala’s name of Pandharpur).

नाडकर्णी आयोगाच्या अहवालात विठोबाच्या नावे राज्यभरात विविध गावात जमिनी असल्याची कागदपत्रे तसेच जमीनी असल्याचे पुरावे नोंदी आहेत. अशा जमिनी ज्या जिल्ह्यात आहेत. तेथील जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला गेला. यामध्ये अडीच हजार एकर जमीन विठोबाच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले आहे (25 hunder acres of land on vitthala’s name of Pandharpur).

कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जमिनी?

सातारा जिल्ह्यातील 9, सोलापूर 8, अकोल्यातील 2, तसेच उस्मानाबाद, अमरावती, नाशिक, यवतमाळ, भंडारा आणि अहमदनगर अशा विविध जिल्ह्यातील अनेक गावात जमिनी असून या ताब्यात घेण्यासाठी स्वतंत्र मालमत्ता अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र आतापर्यंत 1021 एकर जमीन ताब्यात घेण्यात मंदिर समितीला यश आले आहे. अध्याप 1400 एकर जमीन ताब्यात घेण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे.

विशेष म्हणजे आतापर्यंत मदिर समितीला मिळालेल्या जमिनीपैकी सर्वाधिक जमिनी सातारा जिल्ह्यात आहेत. त्याखालोखाल विदर्भातील भंडारा, नागपूर जिल्ह्यात आहेत.

जमिनी ताब्यात घेण्याचं काम केव्हापासून सुरु?

शासनाने कायदा करुन मंदिर ताब्यात घेतलं. यामध्ये कायदा करण्यापूर्वी तत्कालीन नाडकर्णी कमिशनने शासनास दिलेल्या अहवालात विठुरायाला अर्पण केलेल्या जमिनीचा लेखाजोखा देण्यात आला. त्यानुसार गेल्या दोन वर्षांपासून मंदिर समितीने जमिनी ताब्यात घेण्याचे काम सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून गतवर्षी 900 एकर जमीन मंदिर प्रशासनाने ताब्यात घेतली. तर कोरोना संकटात लॉकडाऊनच्या दहा महिन्याच्या काळात पत्र जमा करून सुमारे दोनशे एकर जमिनीच्या कागदपत्रावर मंदिर समितीची मालकी हक्क म्हणून नाव लागले आहे.

शेतकऱ्यांना भाडेतत्वावर जमिनी

सध्या मंदिर समितीकडून जमिनी ताब्यात घेऊन या जमिनी काही शेतकऱ्यांना भाडेतत्वावर देण्यात येत आहेत. त्यामधून मंदिर समितीला उत्पन्न देखील मिळणार आहे. मंदिर समितीने आतापर्यंत ताब्यात घेतलेल्या जमिनी या राज्यातील 81 विविध गावांमधील आहेत. विशेष म्हणजे काही ठिकाणी काही गावात जमिनीच्या नावासाठी विठोबा, विठ्ठल, पांडुरंग, रुक्मिणी अशा वेगवेगळ्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. या नावाच्या ठिकाणी आता कार्यकारी अधिकारी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अशा नावाचा उतारा तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

किती एकर जमिनी ताब्यात घेण्याच्या बाकी? ताब्यात घेण्यासाठी अडचणी नेमक्या काय?

अकोला, यवतमाळ, पंढरपूर, कोल्हापूर या ठिकाणच्या जवळपास 425 एकर जमीनचा वाद हा न्यायालयात प्रलंबित आहे. अनेक शेतकऱ्यांनी या जमिनी ताब्यात देण्यास विरोध दर्शवला आहे. कारण उताऱ्यावर विठ्ठल, पांडुरंग, रुक्मिणी अशी नावे आहेत. त्यामुळे या जमिनी आपल्या गावातील देवदेवतांचीच आहेत, असा शेतकऱ्यांचा दावा आहे. हा वाद आता न्यायालयात गेला असल्याने निकाल लागेपर्यंत नाव लावण्यास विलंब होत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून या जमिनी मंदिरे समितीच्या ताब्यात घेण्याची प्रक्रीया सुरू आहे. आतापर्यंत 1 हजार 21 एकर जमीन ताब्यात घेतली आहे. उर्वरित 1400 एकर जमीन ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोरोना काळात 200 जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. मात्र लवकरच 2500 एकर जमीन पंढरपूरच्या विठोबाच्या ताब्यात येईल. त्यामुळे गोरगरिबांच्या विठोबाच्या खजिन्यात आता शेकडो एकर जमिनीची भर पडणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यानी सांगितले.

हेही वाचा : अर्थसंकल्पानं देशातील जनतेला मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलं; अजित पवारांची जहरी टीका

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं