AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दाराला कुलूप, पोलिसांची नोटीस, जेलमधून सुटल्यावर अनिक्षा जयसिंघानी कुठे गेली?

अमृता फडणवीस यांच्याशी भेटीगाठी वाढल्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या अनिक्षा जयसिंघानी ही आणखी काय खुलासा करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मात्र जामीन मिळाल्यानंतर अनिक्षा अचानक अज्ञातस्थळी रवाना झाल्याचं दिसून येतंय.

दाराला कुलूप, पोलिसांची नोटीस, जेलमधून सुटल्यावर अनिक्षा जयसिंघानी कुठे गेली?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 29, 2023 | 8:55 AM
Share

निनाद करमरकर, उल्हासनगर, ठाणे : अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांच्या ब्लॅकमेलिंग प्रकरणातील महत्त्वाची आरोपी अनिक्षा (Aniksha) जयसिंघानी नेमकी कुठे गेली आहे, यावरून चर्चा सुरु झाली आहे. अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) यांना सोमवारी कोर्टासमोर हजर करण्यात आलं. अनिक्षा हिला जामीन मंजूर करण्यात आला तर अनिल जयसिंघानी याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. तर मंगळवारी अनिक्षा हिची भायखळा जेलमधून सुटका झाली. मात्र जेलमधून सुटल्यावर अनिक्षा जयसिंघानी उल्हासनगर येथील तिच्या घरी गेली नसल्याचं आढळून आलंय. उल्हासनगर येथील तिच्या घराला कुलूप

अनिक्षा जयसिंघानी अज्ञातस्थळी रवाना?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटी रुपयांची लाच देणे आणि ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांनी केल्याचा आरोप आहे. १६ मार्च रोजी अनिक्षा जयसिंघानीला या प्रकरणात क्राइम ब्रांच पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात अनिल जयसिंघानी प्रमुख आरोपी असल्याचा युक्तिवाद कोर्टासमोर करण्यात आला. त्यामुळे  दिसून येतंय. माध्यमांपासून लपण्यासाठी अनिक्षाने घरी येणं टाळलंय की काय असा संशय येतोय.

अनिल जयसिंघानी याचा जामीन अर्ज मंगळवारी फेटाळण्यात आला. मंगळवारी अनिक्षा जयसिंघानी हिची भायखळा जेलमधून सुटका करण्यात आली. त्यानंतर अनिक्षा डीबी मार्ग पोलीस ठाण्यातून रवाना झाली. मात्र तिला ज्या घरातून अटक करण्यात आली होती, त्या उल्हासनगरच्या घरी ती आलेलीच नाही. या घराला कुलूप लागलेलं असून दारावर अनिल जयसिंघानीच्या नावाने पोलिसांची नोटीस लावलेली आहे. अनिक्षा माध्यमांचा ससेमिरा चुकवण्यासाठी अज्ञातस्थळी रवाना झाल्याची शक्यता आहे.

कोर्टात पुन्हा कधी सुनावणी?

मध्य प्रदेशात अनिल जयसिंघानी याच्यावर दाखल करण्यात आलेल्या अन्य एका प्रकरणात पोलिसांनी मुंबई कोर्टातून अनिल जयसिंघानी याची ट्रांझिट रिमांग मागितली आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होईल. तर अनिल जयसिंघानी याच्या जामीन अर्जावर ३१ मार्च रोजी सुनावणी करण्यात येईल. तर अनिल जयसिंघानी याच्यासोबत पकडलेला आणखी एक सहआरोपी निर्मल जयसिंघानी हादेखील न्यायालयीन कोठडीत आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.