Bachchu Kadu : भक्ती म्हणजे प्रदर्शन असतं काय? अमरावतीत बच्चू कडू यांचा सवाल; राणा म्हणजे भाजपचं बुजगावणं

| Updated on: Apr 26, 2022 | 2:13 PM

नवनीत राणा यांनी कारागृहातील सुविधीचे तक्रार केली. त्यावर बच्चू कडू म्हणाले, राणा म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी तयार केलेलं बुजगावन आहे. राणा हे कलाकार आहेत. त्यांना रडायचं कधी हसायचं कधी हे जमते. जेलमध्ये काही फाईव्ह स्टार व्यवस्था मिळणार का. जे सामान्य कैद्यांना ते राणा यांना मिळणार.

Bachchu Kadu : भक्ती म्हणजे प्रदर्शन असतं काय? अमरावतीत बच्चू कडू यांचा सवाल; राणा म्हणजे भाजपचं बुजगावणं
राज्यमंत्री बच्चू कडू
Image Credit source: facebook
Follow us on

अमरावती : हनुमान चालिसा हा भाजपचा अजेंडा आहे, असा आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलाय. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडून राज्यात राष्ट्रपती राजवट लावायचा भाजपचा (BJP) डाव आहे, असंही ते म्हणाले. राणा दाम्पत्याला अमरावतीमधून मुंबईत जाऊन हनुमान चालीसा म्हणायची गरज काय. भक्ती म्हणजे प्रदर्शन असत का? बच्चू कडू यांनी सवाल केलाय. राणांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे घेऊन मत मागितले. तेव्हा मज्जीद, बौद्ध विहारमध्ये गेले. काजीला आणले होते. आता त्यांनी भूमिका बदलली. आधी शिवसेना-भाजप विरोधात मत मागितले. आता भाजपच्या दावणीला बांधले गेले आणि शिवसेनेला (Shiv Sena) बदनाम करत आहेत. राष्ट्रपती (NCP) राजवटीची मागणी करत आहे. पण याचे परिणाम राणा यांना आगामी निवडणुकीत भोगावे लागतील.

जिलेबी पाहिजे असेल तर आम्ही पाठवू

नवनीत राणा यांनी कारागृहातील सुविधीचे तक्रार केली. त्यावर बच्चू कडू म्हणाले, राणा म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी तयार केलेलं बुजगावन आहे. राणा हे कलाकार आहेत. त्यांना रडायचं कधी हसायचं कधी हे जमते. जेलमध्ये काही फाईव्ह स्टार व्यवस्था मिळणार का. जे सामान्य कैद्यांना ते राणा यांना मिळणार. राणा यांना जर जेलमध्ये जिलेबी पाहिजे असेल तर आम्ही पाठऊ. कारागृहात सर्वसामान्य कैद्याप्रमाणेचं जीवन काढावे लागेल. त्यांना काही तिथं लक्झरी सुविधा मिळणार नाहीत, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.

राणांनी भूमिका बदलली

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन नवनीत राणा यांनी प्रचार केला. शिवसेना-भाजप विरोधात मत मागितले. आता त्या भाजपच्या खेम्यात गेल्या आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मदत मागत आहेत. याचे परिणाम त्यांना पुढच्या निवडणुकीत भोगावे लागतील, असा आरोप बच्चू कडू यांनी केलाय. कलाकार माणसं फक्त कलाकारीच करू शकतात. नवनीत राणा या चांगल्या कलाकारी करतात. पण, आता ही कलाकारी महागात पडली असल्याचं ते म्हणाले.