नांदेड : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याची घोषणा केलीय. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेत असल्याची माहिती त्यांनी दिलीय. यावेळी त्यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचंही आवाहन केलंय. तसेच या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि अत्यावश्यक सेवांवर परिणाम होणार नाही, असं आश्वासनही दिलंय.
अशोक चव्हाण म्हणाले, “नांदेड जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होते आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रमुख अधिकार्यांसमवेत आज (21 मार्च) सकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक झाली. कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात, असे निर्देश मी या बैठकीत दिले. व्यापक जनहितास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून 11 दिवसांसाठी संपूर्ण नांदेड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व अत्यावश्यक सेवांवर परिणाम होणार नाही, याची काळजी प्रशासन घेते आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, ही विनंती.”
नांदेड जिल्ह्यातील कोरोनाची परिस्शिती चिंताजनक होते आहे. या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील प्रमुख अधिकार्यांसमवेत आज सकाळी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक झाली. कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात, असे निर्देश मी या बैठकीत दिले. pic.twitter.com/NYdWLWzETf
— Ashok Chavan (@AshokChavanINC) March 21, 2021
नांदेडमध्ये काय सुरु काय बंद?
हेही वाचा :
IPS अधिकाऱ्यांनाही प्रश्न पडला, कोव्हिशिल्ड की कोवॅक्सीन, कोणती लस चांगली?
दररोज 1 लाख लोकांना लस, 45 लाखाचं टार्गेट, मुंबई आयुक्तांचा मास्टर प्लॅन
व्हिडीओ पाहा :
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.