AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर माझे सर्व उमेदवार मागे घेतो, उद्धव ठाकरे यांचे थेट आव्हान

uddhav thackeray amravati: मागील वेळेस जय भवानी, जय शिवाजी बोलू नये, असा आक्षेप निवडणूक आयोगाने घेतला होता. परंतु आम्ही ते ऐकणार नाही. आम्ही जय भवानी, जय शिवाजी बोलणार आहे. तसेच आमचे सरकार आल्यावर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधणार आहे.

...तर माझे सर्व उमेदवार मागे घेतो, उद्धव ठाकरे यांचे थेट आव्हान
uddhav thackeray
| Updated on: Nov 07, 2024 | 3:30 PM
Share

शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा झंझावात सुरु केला आहे. अमरावतीमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. आमचे सरकार पाडले, असे ते म्हणतात. परंतु माझे सरकार खूप चांगले काम करत होते. शेतकऱ्यांसाठी काम करत होते. मोदी म्हणतात, मी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले असेल तर सांगा मी माझे सर्व उमेदवार मागे घेईल, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.

प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर

उद्धव ठाकरे म्हणाले, आज बंर वाटल राजेंद्र गवई माझ्या व्यासपीठावर आले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि रा.सु. गवई यांनी मैत्री होती. त्यांनी मैत्रीत कधी राजकारण येऊ दिले नाही. मागील वेळेस जय भवानी, जय शिवाजी बोलू नये, असा आक्षेप निवडणूक आयोगाने घेतला होता. परंतु आम्ही ते ऐकणार नाही. आम्ही जय भवानी, जय शिवाजी बोलणार आहे. तसेच आमचे सरकार आल्यावर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधणार आहे.

मुंब्रात मंदिर बांधणार

देवेंद्र फडणवीस यांनी मला आव्हान दिले. मुंब्रात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधा? मुंब्रा काय महाराष्ट्रात नाही का? मी हे आव्हान स्वीकारतो. मी मुंब्रात शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणार आहे. परंतु सिंधुदुर्गमधील शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. मोदी यांनी माफी मागितली, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली नाही.

मुलींना नाही तर मुलांनाही मोफत शिक्षण देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. उच्च शिक्षणसुद्धा मोफत देणार आहे. तसेच मी मुख्यमंत्री असतो तर राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमुक्ती केली असते. उद्योगातही महाराष्ट्र मागे गेला आहे. नागपूरमधील टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. तो फडणवीस यांना वाचवता आले नाही. राज्यातील सर्व काही गुजरातमध्ये जात आहे. राज्यातील युवकांना दर महिन्याला चाळीस हजार रुपये देणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.