AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर माझे सर्व उमेदवार मागे घेतो, उद्धव ठाकरे यांचे थेट आव्हान

uddhav thackeray amravati: मागील वेळेस जय भवानी, जय शिवाजी बोलू नये, असा आक्षेप निवडणूक आयोगाने घेतला होता. परंतु आम्ही ते ऐकणार नाही. आम्ही जय भवानी, जय शिवाजी बोलणार आहे. तसेच आमचे सरकार आल्यावर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधणार आहे.

...तर माझे सर्व उमेदवार मागे घेतो, उद्धव ठाकरे यांचे थेट आव्हान
uddhav thackeray
| Updated on: Nov 07, 2024 | 3:30 PM
Share

शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा झंझावात सुरु केला आहे. अमरावतीमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. आमचे सरकार पाडले, असे ते म्हणतात. परंतु माझे सरकार खूप चांगले काम करत होते. शेतकऱ्यांसाठी काम करत होते. मोदी म्हणतात, मी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले असेल तर सांगा मी माझे सर्व उमेदवार मागे घेईल, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.

प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर

उद्धव ठाकरे म्हणाले, आज बंर वाटल राजेंद्र गवई माझ्या व्यासपीठावर आले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि रा.सु. गवई यांनी मैत्री होती. त्यांनी मैत्रीत कधी राजकारण येऊ दिले नाही. मागील वेळेस जय भवानी, जय शिवाजी बोलू नये, असा आक्षेप निवडणूक आयोगाने घेतला होता. परंतु आम्ही ते ऐकणार नाही. आम्ही जय भवानी, जय शिवाजी बोलणार आहे. तसेच आमचे सरकार आल्यावर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधणार आहे.

मुंब्रात मंदिर बांधणार

देवेंद्र फडणवीस यांनी मला आव्हान दिले. मुंब्रात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधा? मुंब्रा काय महाराष्ट्रात नाही का? मी हे आव्हान स्वीकारतो. मी मुंब्रात शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणार आहे. परंतु सिंधुदुर्गमधील शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. मोदी यांनी माफी मागितली, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली नाही.

मुलींना नाही तर मुलांनाही मोफत शिक्षण देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. उच्च शिक्षणसुद्धा मोफत देणार आहे. तसेच मी मुख्यमंत्री असतो तर राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमुक्ती केली असते. उद्योगातही महाराष्ट्र मागे गेला आहे. नागपूरमधील टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. तो फडणवीस यांना वाचवता आले नाही. राज्यातील सर्व काही गुजरातमध्ये जात आहे. राज्यातील युवकांना दर महिन्याला चाळीस हजार रुपये देणार आहे.

Follow Us
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.