AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर माझे सर्व उमेदवार मागे घेतो, उद्धव ठाकरे यांचे थेट आव्हान

uddhav thackeray amravati: मागील वेळेस जय भवानी, जय शिवाजी बोलू नये, असा आक्षेप निवडणूक आयोगाने घेतला होता. परंतु आम्ही ते ऐकणार नाही. आम्ही जय भवानी, जय शिवाजी बोलणार आहे. तसेच आमचे सरकार आल्यावर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधणार आहे.

...तर माझे सर्व उमेदवार मागे घेतो, उद्धव ठाकरे यांचे थेट आव्हान
uddhav thackeray
| Updated on: Nov 07, 2024 | 3:30 PM
Share

शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा झंझावात सुरु केला आहे. अमरावतीमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. आमचे सरकार पाडले, असे ते म्हणतात. परंतु माझे सरकार खूप चांगले काम करत होते. शेतकऱ्यांसाठी काम करत होते. मोदी म्हणतात, मी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले असेल तर सांगा मी माझे सर्व उमेदवार मागे घेईल, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.

प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर

उद्धव ठाकरे म्हणाले, आज बंर वाटल राजेंद्र गवई माझ्या व्यासपीठावर आले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि रा.सु. गवई यांनी मैत्री होती. त्यांनी मैत्रीत कधी राजकारण येऊ दिले नाही. मागील वेळेस जय भवानी, जय शिवाजी बोलू नये, असा आक्षेप निवडणूक आयोगाने घेतला होता. परंतु आम्ही ते ऐकणार नाही. आम्ही जय भवानी, जय शिवाजी बोलणार आहे. तसेच आमचे सरकार आल्यावर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधणार आहे.

मुंब्रात मंदिर बांधणार

देवेंद्र फडणवीस यांनी मला आव्हान दिले. मुंब्रात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधा? मुंब्रा काय महाराष्ट्रात नाही का? मी हे आव्हान स्वीकारतो. मी मुंब्रात शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणार आहे. परंतु सिंधुदुर्गमधील शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. मोदी यांनी माफी मागितली, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली नाही.

मुलींना नाही तर मुलांनाही मोफत शिक्षण देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. उच्च शिक्षणसुद्धा मोफत देणार आहे. तसेच मी मुख्यमंत्री असतो तर राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमुक्ती केली असते. उद्योगातही महाराष्ट्र मागे गेला आहे. नागपूरमधील टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. तो फडणवीस यांना वाचवता आले नाही. राज्यातील सर्व काही गुजरातमध्ये जात आहे. राज्यातील युवकांना दर महिन्याला चाळीस हजार रुपये देणार आहे.

गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय
गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय.
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?.
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता.
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी.
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता.
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका.
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया.
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले.
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल.