AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | औरंगाबाद महापालिकेच्या आराखड्यावरून राजकीय आखाडा, सर्वच राजकीय पक्षांचा नव्या रचनेला विरोध

वस्ती, मुख्य रस्ते, डीपी, रोड, तळे या नैसर्गिक हद्दी ओलांडू नये, असे नियम असताना तो न पाळून आराखडा तयार करण्यात आला आहे. यावर आमचा तीव्र आक्षेप आहे, अशी प्रतिक्रिया राजकीय पक्षांनी दिली आहे.

Aurangabad | औरंगाबाद महापालिकेच्या आराखड्यावरून राजकीय आखाडा, सर्वच राजकीय पक्षांचा नव्या रचनेला विरोध
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 03, 2022 | 10:43 AM
Share

औरंगाबादः मागील दोन वर्षांपासून निवडणुकांची वाट पाहणाऱ्या इच्छुकांची आणि औरंगाबादकरांची (Aurangabad) प्रतीक्षा अखेर संपली आहे. महापालिकेने 126 नगरसेवकांच्या (Corporator) निवडणुकीसाठी 42 प्रभागांच्या सीमा निश्चितीचा आराखडा गुरुवारी जाहीर केला. मात्र या आराखड्यावर (Ward structure) सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. नेत्यांनी आपला आक्षेप नोंदवला असून अनेक नागरिकांनाही आपली कॉलनी किंवा वसाहत नेमक्या कोणत्या प्रभागात गेलाय, हे स्पष्टपणे कळत नसल्याचं सांगितलं आहे. महानगरपालिकेने येत्या 16 जूनपर्यंत या आराखड्यावरील हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी मुदत दिली आहे. या हरकतींची माहिती 17 जून रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवली जाईल. त्यानंतर 24 जूनपर्यंत आयोगातर्फे नियुक्त अधिकाऱ्यांसमोर यासंदर्भात सुनावणी होईल. मात्र राजकीय पक्षांनी या आराखड्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

राजकीय पक्षांचे आक्षेप काय?

– शिवसेना- राजेंद्र जंजाळ- माजी उपमहापौर– वस्ती, मुख्य रस्ते, डीपी, रोड, तळे या नैसर्गिक हद्दी ओलांडू नये, असे नियम असताना तो न पाळून आराखडा तयार करण्यात आला आहे. यावर आमचा तीव्र आक्षेप आहे. – शिवसेना गटनेते- राजू वैद्य- अनेक ठिकाणी प्रस्थापित वॉर्ड विविध भागांत विभागण्यात आला आहे. क्रांती चौक वॉर्डाचेही असेच तुकडे करण्यात आले आहेत. याला आम्ही विरोध करणार आहोत. – भाजप- राजू शिंदे- माजी उपमहापौर- दलित मुस्लिम वसाहतीचे ईबी प्रगणक गटातील भाग मुद्दाम भाजपच्या वॉर्डाला जोडले आहेत. यामुळे भाजपाला नुकसान होण्याची खबरदारी घण्यात आलेली दिसते. राजकीय दबावाखाली हा आराखडा तयार करण्यात आला असून याला आमचा आक्षेप आहे. – राष्ट्रवादी शहराध्यक्ष खाजा शरफोद्दीन- नव्या प्रभाग रचनेत हद्दीचे विभाजन योग्य पद्धतीने झालेले नाही. अनेक वॉर्डात हेच चित्र आहे. त्यावर आम्ही आक्षेप घेणार आहोत. – MIM गटनेते- नासेर सिद्दिकी- 2015 मधील निवडणुकीत शहरातील तीन विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या 10 लाखांच्या जवळपास होती. आता ती अचानक साडेबारा लाख कशी झाली, याबाबत साशंकता आहे. आम्ही यावर आक्षेप नोंदवणार आहोत.

मतदार- उमेदवारांची स्थिती काय?

– महापालिकेच्या हद्दीत 12 लाख 28 हजार 032 एकूण मतदार आहेत. – 2 लाख 38 हजार 105 अनुसूचित जातींचे मतदार आहेत. – 16,320 अनुसूचित जमातींचे मतदार आहेत. – एकूण प्रभाग- 42 – प्रत्येक प्रभागात सरासरी मतदार 29,239 -एकूण नगरसेवक- 126 (प्रत्येक प्रभागात 3 नगरसेवक) – अनु. जाती नगरसेवक- 24 (महिलांसाठी राखीव 12) – अनु. जमाती नगरसेवक- 02 (महिलांसाठी राखीव 01) – सर्वसाधारण नगरसेवक – 100 (महिलांसाठी राखीव 50)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.