AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू, महापालिका हॉकर्स झोन पॉलिसी राबवणार

औरंगाबाद: औरंगाबाद महानरपालिका (Aurangabad Municipal Corporation) लवकरच फेरीवाला धोरण (hawkers zone policy) तयार करणार आहे. त्या आधी फेरीवाल्यांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी आणि रस्ता विक्रेते कायदा 2014 बद्दल फेरीवाल्यांमध्ये किती जागरूकता आहे हे जाणून घेण्यासाठी मनपा आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे शहरात सर्वेक्षण करण्यात येत आहे. या माहितीवरून फेरीवाल्यांसाठी विशेष झोन तयार केले […]

औरंगाबाद शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू, महापालिका हॉकर्स झोन पॉलिसी राबवणार
फेरीवाला धोरणाच्या तयारीसाठी औरंगाबादेत फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू.
| Edited By: | Updated on: Oct 14, 2021 | 4:11 PM
Share

औरंगाबाद: औरंगाबाद महानरपालिका (Aurangabad Municipal Corporation) लवकरच फेरीवाला धोरण (hawkers zone policy) तयार करणार आहे. त्या आधी फेरीवाल्यांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी आणि रस्ता विक्रेते कायदा 2014 बद्दल फेरीवाल्यांमध्ये किती जागरूकता आहे हे जाणून घेण्यासाठी मनपा आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे शहरात सर्वेक्षण करण्यात येत आहे. या माहितीवरून फेरीवाल्यांसाठी विशेष झोन तयार केले जातील, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. तसेच फेरीवाल्यांसमोरील अनेक समस्यांचेही निराकरण या मोहिमेद्वारे केले जाईल.

लवकरच धोरणाचा मसुदा तयार करणार

मनपा आयुक्त आणि प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय ह्यांचा मार्गदर्शनाखाली औरंगाबाद महानगपालिका लवकरच फेरीवाला धोरण चा मसुदा तयार करणार आहे. ह्याचासाठी मनपा उपायुक्त अपर्णा थेटे आणि उपायुक्त सौरभ जोशी ह्यांना जवाबदारी दिली गेली आहे. त्यासाठी शहरातील 9 वॉर्ड मध्ये फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

200 फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण

यासाठी एमपी लॉ कॉलेजमधील प्राध्यापक अपर्णा कोतापल्ले यांच्या समन्वयाने महानगरपालिकेने 21 विद्यार्थ्यांची निवड केली आहे. १४ ऑक्टोबर पर्यंत ५०० फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. यापैकी २०० फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून फेरीवाल्यांच्या गरजा, समस्या आणि अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सर्वेक्षणाअंती आलेल्या निष्कर्षाच्या आधारावर हे फेरीवाला धोरण तयार करण्यात येणार आहे. याबरोबरच हे धोरण तयार करण्यासाठी दिल्लीतील IGSSS एनजीओमधील अॅड्रियन डिक्रूझ आणि अरविंद उन्नी सहकार्य करत आहेत. हे धोरण तयार करण्यासाठी सल्लागार म्हणून ते काम पाहत आहेत. अर्बन रिसर्च फाउंडेशनच्या पल्लवी देवरे आणि श्रीनिवास देशमुख यांनी देखील यासाठी सहकार्य केले आहे. विद्यार्थ्यांसाठी समन्वय आणि प्रशिक्षण देण्याचे काम ते करत आहेत.

फेरीवाल्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न- आस्तिक कुमार पांडेय

औरंगाबाद शहराला आतापर्यंत फेरीवाला धोरण (हॉकर्स झोन पॉलिसी) नव्हते. त्यामुळे शहरात फेरीवाल्यांची समस्या वाढलेली दिसून येत आहेत. त्यामुळेच फेरीवाल्यांची समस्या सोडवण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिका प्रयत्नशील आहे. यासाठी फेरीवाल्यांबरोबरच सर्व भागधारकांना देखील सोबत घेऊन हे धोरण बनविण्यात येणार आहे. या धोरणामुळे फेरीवाले आणि भागधारक दोन्हींच्या समस्या सोडवता येतील, अशी प्रतिक्रिया मनपा आयुक्त आणि प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली.

इतर बातम्या-

औरंगाबाद: गुंठेवारीची मालमत्ता नियमित करा, अन्यथा १ नोव्हेंबरनंतर बुलडोझर चालणार, मनपाचा इशारा

थरकाप उडवणारा खून, नसा कापल्या, कान छाटले, डोक्यात हातोड्याचे वार, छातीवर बसून गळा चिरला, औरंगाबाद हादरलं!

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.