
औरंगाबादः जिल्ह्यातील अप्पर तहसील कार्यालयात कार्यरत असलेले तलाठी लक्ष्मण बोराटे यांनी रविवारी आत्महत्या (Aurangabad suicide) केली. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले होते. तसेच या चिठ्ठीत जवळपास 13 जणांची नावे असून त्यात वरिष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांचाही समावेश आहे. बोराटे यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.
सातारा पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली असून आतापर्यंत पोलिसांनी या चिठ्ठीतील नावे उघड करण्यास मनाई केली होती. बुधवारी बोराटे यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यांची सातारा पोलीसांकडून चौकशी केली जाणार आहे. या चौकशीत मंगळवारी 8 जणांना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे.
दरम्यान, बोराटे यांच्याविरोधातदेखील एका महिला कर्मचाऱ्याने तहसीलदार, विशाखा समिती व पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. सिटी चौक पोलिसांनी त्या तक्रारीच्या अनुषंगाने तत्कालीन तहसीलदार तायडे यांच्याकडून माहितीदेखील मागवल्याची नोंद असल्याचे समोर आले आहे. या तक्रारींनुसारदेखील पोलिसांचा तपास आणखी वेगळे वळण घेऊ शकतो.
इतर बातम्या-