AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घोषणांची अतिवृष्टी, सरकारकडं भावनांचा दुष्काळ, उद्धव ठाकरे यांचा घणाघात

50 हजार रुपये हेक्टरी मदत मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

घोषणांची अतिवृष्टी, सरकारकडं भावनांचा दुष्काळ, उद्धव ठाकरे यांचा घणाघात
उद्धव ठाकरे यांचा घणाघात Image Credit source: tv 9
| Updated on: Oct 23, 2022 | 3:17 PM
Share

औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पेंडापूर येथे पोहचले. इथल्या परिस्थितीची पाहणी केली. उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. येथे अनेक शेतकरी आलेत. अनेकांच्या हातात निवेदनाची पत्रदेखील होती. औरंगाबाद जिल्ह्यातलं पेंडापूर हे गाव. पेंडापूर गावाची लोकसंख्या 1800 ते 1900 आहे. शेतातील मका, कपाशी व सोयाबीन या पिकांचं नुकसान झालं. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सरकार घोषणांची अतिवृष्टी करत आहे. मात्र, राज्य सरकारकडं भावनांचा दुष्काळ आहे.

उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, पाऊस किती पडावं हे सरकारच्या हातात नसतं. दोन प्रकराच्या आपत्ती असतात. कोरडा दुष्काळ व अतिवृष्टी. अस्मानी संकटं आल्यानंतर त्याचं घरदार उघड पडू नये. हे सरकार सांगते की, दुष्काळ जाहीर करावा. अशी परिस्थिती नाही. म्हणून मी पाहणी करायला आलो. ही माझी प्रतिकात्मक भेट आहे.

खरं काय खोटं काय हे राज्यातल्या जनतेला कळू द्या. रेशन घ्यायला पण, पैसे नाहीत. शिधा येतो कुठूंन शेतकऱ्यांकडून ना. त्यात घोटाळा झाला नाही झाला हे नंतरच कळेल. 50 हजार रुपये हेक्टरी मदत मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीला शिवसेना पाठींबा देत असल्याचं ते म्हणाले. पंचनामे कधी करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ऐन दिवाळीत सरकारकडं तुमच्याकडं लक्ष द्यायला वेळ नसला, तरी शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. काळजी करू नका. धीर सोडू नका. आत्महत्येचा विचार मनात आणू नका. कृषिमंत्री, मुख्यमंत्री काय करतात. उत्सव साजरे करताना प्रजेकडं पाहणं हे राज्य सरकारचं काम असतं.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.