AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

HSC Exams| राज्यात उद्यापासून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा, मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत 408 केंद्र सज्ज!

बारावीची ही परीक्षा 07 एप्रिलपर्यंत चालणार आहे. तर दहावीची परीक्षआ 15 मार्च ते 04 एप्रिल पर्यंत चालणार आहे. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहून परीक्षा द्यावी, असे आवाहन विभागीय मंडळाच्या अध्यक्ष व सचिवांनी केले आहे.

HSC Exams| राज्यात उद्यापासून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा, मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत 408 केंद्र सज्ज!
प्रातिनिधीक फोटो Image Credit source: File Photo
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 03, 2022 | 3:00 AM
Share

औरंगाबादः महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या  वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला (HSC Exams) उद्या म्हणजेच शुक्रवार दिनांक 4 मार्चपासून प्रारंभ होत आहे. परीक्षासाठी बोर्डाकडून (HSC Board) जय्यत तयारी करण्यात आली आहे. परीक्षेच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विविध भरारी पथकांचीही स्थापना करण्यात आली आहे. मराठवाडा विभागातील (Marathwada) पाच जिल्ह्यांमधून सुमारे 1, 69, 289 विद्यार्थी बारावीची परीक्षा देतील.

मराठवाड्यात किती केंद्रांवर सज्जता?

औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील 408 केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. विभागात 1 लाख 69 हजार 289 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. या पार्श्वभूमीवर बोर्डाने तयारीदेखील सुरु केली आहे. तर विद्यार्थ्यांनीही ऑनलाइनचा विषय टाळून ऑफलाइन परीक्षेसाठी तयारी केली आहे. बारावीची ही परीक्षा 07 एप्रिलपर्यंत चालणार आहे. तर दहावीची परीक्षआ 15 मार्च ते 04 एप्रिल पर्यंत चालणार आहे. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहून परीक्षा द्यावी, असे आवाहन विभागीय मंडळाच्या अध्यक्ष व सचिवांनी केले आहे.

कोणत्या जिल्ह्यातून किती विद्यार्थी?

बारावीच्या परीक्षेसाठी औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यांतील विद्यार्थी आणि केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे- औरंगाबाद- 58, 374 विद्यार्थी, 153 केंद्र बीड- 38,143 विद्यार्थी, 99 केंद्र जालना-31376 विद्यार्थी, 69 केंद्र परभणी-24,471 विद्यार्थी, 55 केंद्र हिंगोली- 13,472 विद्यार्थी, 32 केंद्र

दहावीच्या परीक्षेसाठी किती विद्यार्थी, किती केंद्र?

औरंगाबाद- 64,622 विद्यार्थी, 224 केंद्र बीड- 41, 676 विद्यार्थी, 156 केंद्र जालना-30, 483 विद्यार्थी, 100 केंद्र परभणी-28, 695 विद्यार्थी, 93 केंद्र हिंगोली- 16126 विद्यार्थी, 53 केंद्र

इतर बातम्या-

ICC T20 Rankings: श्रेयस अय्यरची मोठी झेप, विराट, रोहित टॉप-10 मधून बाहेर

Weight Loss Tips : तुम्हाला वजन कमी करायचे आहे तर तुमच्या आहारात या फळांचा समावेश करा, आणि फायदे पाहा…

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?