AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

100 कोटींच्या उत्सवात कुठेय औरंगाबाद ? जिल्ह्यात 20 टक्केच नागरिकांचे दोन डोस, जागे व्हा, लस घ्या!

जिल्ह्यात 32 लाख 24 हजार 677 जणांना लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. यापैकी 23 लाख 48 हजार 189 जणांनी (52 टक्के) पहिला तर 6 लाख 70 हजार 390 लोकांनी (20 टक्के) दुसरा डोस घेतला.

100 कोटींच्या उत्सवात कुठेय औरंगाबाद ? जिल्ह्यात 20 टक्केच नागरिकांचे दोन डोस, जागे व्हा, लस घ्या!
जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे महापालिकेचे आवाहन
| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 10:29 AM
Share

औरंगबााद: शंभर कोटी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण(Corona Vaccination)  पूर्ण केल्याच्या आनंदात संपूर्ण देशभरात उत्सव साजरा केला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मात्र लसीकरणात नागरिकांची साथ मिळत नसल्याचे चित्र आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील 23 लाख 48 हजार 189 डोसचा नगण्य वाटा आहे. जिल्ह्यात 32 लाख 24 हजार 677 जणांना लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. यापैकी 23 लाख 48 हजार 189 जणांनी (52 टक्के) पहिला तर 6 लाख 70 हजार 390 लोकांनी (20 टक्के) दुसरा डोस घेतला. विशेष म्हणजे 16 जानेवारीला सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत सर्वाधिक 5 लाख लसीकरण एकट्या सप्टेंबर महिन्यात झाले. ऑक्टोबर महिन्यात महापालिकेकडून (Aurangabad Municipal corporation) लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. नागरिकांना अगदी सहज शक्य होईल, एवढ्या मोक्याच्या ठिकाणी लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. तरीही नागरिक लसीकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत. कोरोनाचं संकट अद्याप संपलेलं नाही, हे लक्षात घेऊन नागरिकांनी लसीकरणाला प्रतिसाद देण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे.

आता मिशन युवा स्वास्थ्य

मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेअंतर्गत मनपाकडून महाविद्यालयांमध्ये लसीकरण शिबिरे घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांचा डेटा मिळवण्यासाठी विद्यापीठ व महाविद्यालयांना पत्र पाठवणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडेलचा यांनी सांगितले. 23 ऑक्टोबर रोजी देवगिरी, 25 ऑक्टोबरला एमपी लॉ कॉलेजात लसीकरण होईल. स.भु., वाय.बी. चव्हाण, विवेकानंद, सय्यद महाविद्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे.

गुरुवारी दुपटीने वाढली रुग्णसंख्या

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत घट दिसून येत होती. मात्र बुधवारच्या तुलनेत गुरुवारी जिल्ह्यात रुग्णसंख्या दुपटीने वाढली दिवसभरात 25 कोरोना रुग्णांची भर पडली असून यात मनपा हद्दीतील 14 आणि ग्रामीण भागातील 11 रुग्णांचा समावेश आहे. शहरातील शांतीनिकेतन कॉलनीत 1, नॅशनल कॉलनीत 2, इतर ठिकाणी 11 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर उपचार सुरु असताना दोन रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली असून सध्या 130 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 19 ऑक्टोबरला जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच आठच रुग्णांची वाढ झाली होती. मात्र त्यानंतर बुधवारी 11 रुग्णांची भर पडली. गुरुवारी तर दुपटीपेक्षा जास्त म्हणजेच 25 रुग्णांची वाढ झाल्याने शहरातील नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

शहरातील नागरिकांनी प्रतिसाद द्यावा

औरंगाबाद शहरात 10 लाख 55 हजार 600 नागरिकांच्या लसीकरणाचे लक्ष्य आहे. त्यापैकी 9,02,117 जणांनी लस घेतली. 3,39,000 जणांनी दोन्ही डोस घेतले आहे. तर 5,81,357 जणांनी पहिला डोस घेतला आहे. महापालिका आता महाविद्यालयांमध्ये लसीकरण शिबिर भरवणार आहे. 18 वर्षांपुढील तरुणांनी कोरोना लस घ्यावी, याकरिता ही मोहीम राबवण्यात येणार आहे, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

इतर बातम्या-

औरंगाबाद शहरात लाईट हाऊस प्रकल्पाला उत्तम प्रतिसाद, सहा महिन्यात 150 पेक्षा जास्त युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण

पुरुषांना बांधून ठेवले अन् चौघांची वासना जागृत झाली, तोंडोळी दरोड्याची आपबिती, औरंगाबाद पोलिसांसमोर नवे आव्हान!

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.