AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

100 कोटींच्या उत्सवात कुठेय औरंगाबाद ? जिल्ह्यात 20 टक्केच नागरिकांचे दोन डोस, जागे व्हा, लस घ्या!

जिल्ह्यात 32 लाख 24 हजार 677 जणांना लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. यापैकी 23 लाख 48 हजार 189 जणांनी (52 टक्के) पहिला तर 6 लाख 70 हजार 390 लोकांनी (20 टक्के) दुसरा डोस घेतला.

100 कोटींच्या उत्सवात कुठेय औरंगाबाद ? जिल्ह्यात 20 टक्केच नागरिकांचे दोन डोस, जागे व्हा, लस घ्या!
जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे महापालिकेचे आवाहन
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Oct 22, 2021 | 10:29 AM
Share

औरंगबााद: शंभर कोटी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण(Corona Vaccination)  पूर्ण केल्याच्या आनंदात संपूर्ण देशभरात उत्सव साजरा केला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मात्र लसीकरणात नागरिकांची साथ मिळत नसल्याचे चित्र आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील 23 लाख 48 हजार 189 डोसचा नगण्य वाटा आहे. जिल्ह्यात 32 लाख 24 हजार 677 जणांना लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. यापैकी 23 लाख 48 हजार 189 जणांनी (52 टक्के) पहिला तर 6 लाख 70 हजार 390 लोकांनी (20 टक्के) दुसरा डोस घेतला. विशेष म्हणजे 16 जानेवारीला सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत सर्वाधिक 5 लाख लसीकरण एकट्या सप्टेंबर महिन्यात झाले. ऑक्टोबर महिन्यात महापालिकेकडून (Aurangabad Municipal corporation) लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. नागरिकांना अगदी सहज शक्य होईल, एवढ्या मोक्याच्या ठिकाणी लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. तरीही नागरिक लसीकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत. कोरोनाचं संकट अद्याप संपलेलं नाही, हे लक्षात घेऊन नागरिकांनी लसीकरणाला प्रतिसाद देण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे.

आता मिशन युवा स्वास्थ्य

मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेअंतर्गत मनपाकडून महाविद्यालयांमध्ये लसीकरण शिबिरे घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांचा डेटा मिळवण्यासाठी विद्यापीठ व महाविद्यालयांना पत्र पाठवणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडेलचा यांनी सांगितले. 23 ऑक्टोबर रोजी देवगिरी, 25 ऑक्टोबरला एमपी लॉ कॉलेजात लसीकरण होईल. स.भु., वाय.बी. चव्हाण, विवेकानंद, सय्यद महाविद्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे.

गुरुवारी दुपटीने वाढली रुग्णसंख्या

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत घट दिसून येत होती. मात्र बुधवारच्या तुलनेत गुरुवारी जिल्ह्यात रुग्णसंख्या दुपटीने वाढली दिवसभरात 25 कोरोना रुग्णांची भर पडली असून यात मनपा हद्दीतील 14 आणि ग्रामीण भागातील 11 रुग्णांचा समावेश आहे. शहरातील शांतीनिकेतन कॉलनीत 1, नॅशनल कॉलनीत 2, इतर ठिकाणी 11 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर उपचार सुरु असताना दोन रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली असून सध्या 130 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 19 ऑक्टोबरला जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच आठच रुग्णांची वाढ झाली होती. मात्र त्यानंतर बुधवारी 11 रुग्णांची भर पडली. गुरुवारी तर दुपटीपेक्षा जास्त म्हणजेच 25 रुग्णांची वाढ झाल्याने शहरातील नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

शहरातील नागरिकांनी प्रतिसाद द्यावा

औरंगाबाद शहरात 10 लाख 55 हजार 600 नागरिकांच्या लसीकरणाचे लक्ष्य आहे. त्यापैकी 9,02,117 जणांनी लस घेतली. 3,39,000 जणांनी दोन्ही डोस घेतले आहे. तर 5,81,357 जणांनी पहिला डोस घेतला आहे. महापालिका आता महाविद्यालयांमध्ये लसीकरण शिबिर भरवणार आहे. 18 वर्षांपुढील तरुणांनी कोरोना लस घ्यावी, याकरिता ही मोहीम राबवण्यात येणार आहे, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

इतर बातम्या-

औरंगाबाद शहरात लाईट हाऊस प्रकल्पाला उत्तम प्रतिसाद, सहा महिन्यात 150 पेक्षा जास्त युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण

पुरुषांना बांधून ठेवले अन् चौघांची वासना जागृत झाली, तोंडोळी दरोड्याची आपबिती, औरंगाबाद पोलिसांसमोर नवे आव्हान!

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...