AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalna | मटनाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून हाणामारी, जालन्यात 4 जखमी, एक गंभीर

या घटनेनंतर मटण विक्रेत्याने पोलिसात तक्रार दाखल केली. आरोपींमध्ये वाद सुरु झाल्यावर लोधी मोहल्ला भागात जमाव एकत्र झाला. यात आरोपींनी कोयत्याने वार केल्याने चौघे जण जखमी झाले.

Jalna | मटनाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून हाणामारी, जालन्यात 4 जखमी, एक गंभीर
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: May 14, 2022 | 2:53 PM
Share

जालनाः जालना शहरातून एक हाणामारीची बातमी आहे. शहरात रात्री लोधी मोहल्ला (Lodhi Mohalla) भागात दोन गटात तुंबळ हाणामारी (Jalna Rada) झाली. मटणाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून हा वाद सुरु झाला आणि पाहता पाहता दोन गट आपापसात भिडले. सुरुवातील शाब्दिक वाद होते, त्यानंतर शब्दाला शब्द वाढत गेला आणि दोन गटांचे भांडण विकोपाला गेले. दोन्ही गटातील लोक हाणामारीवर उतरले. यात चौघे जखमी (Injured) झाले तर जखमींपैकी एकाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती हाती आली आहे. चौघांवरही उपचार सुरु आहेत.

कधी, कुठे घडली घटना?

याबाबत अधिक माहिती अशी की, जालना शहरात रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली. शहरातील लोधी मोहल्ला भागात मटनाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून दोन गटात हा वाद सुरु झाला. या वादात चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या चौघांवरही औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मटणविक्रेत्याची पोलिसात तक्रार

या घटनेनंतर मटण विक्रेत्याने पोलिसात तक्रार दाखल केली. आरोपींमध्ये वाद सुरु झाल्यावर लोधी मोहल्ला भागात जमाव एकत्र झाला. यात आरोपींनी कोयत्याने वार केल्याने चौघे जण जखमी झाले. सदरबाजार पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून एकूण सहा जणांविरोधात तक्रार देण्यात आली आहे.

चांदई घटनेत 250 जणांवर गुन्हे

दरम्यान जालन्यातील चांदई गावातील पोलिसांवरील दगडफेक प्रकरणी 200 ते 250 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी 18 जणांना अटक झाली आहे. गावातील कमानीला नाव देण्यावरून या वादाला सुरुवात झाली होती. भोकरदन तालुक्यातल्या चांदई गावांमध्ये दोन गटात झालेल्या दगडफेकी नंतर आता पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन सुरू करत आरोपींची धरपकड सुरू केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 200 ते 250 जणांवर गुन्हे दाखल केले असून यातील गावातील सरपंचासह 18 जणांना पोलिसांनी अटक केलय, सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. काल झालेल्या दगडफेकीनंतर पोलिसांनी या प्रकरणात अडीचशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत., यातील 18 जणांना पोलिसांनी अटक केली असून सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. काल झालेल्या दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी झाले असून यात पोलिसांच्या दोन जीप व्हॅन तसेच अग्निशमन दलाच्या गाडीची देखील तोडफोड करण्यात आली होती.

Follow Us
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
राहुल गांधींच्या भूमिकेवर कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय
भरत गोगावले यांची घोषणा: रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय