औरंगाबादः त्रिपुरा दंगलीचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्यामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. औरंगाबादमध्ये त्यांनी टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी बोलताना हे वक्तव्य केले. देशभरात वाढलेल्या महागाईविरोधात संजय राऊत यांच्या नेतृत्वात आज औरंगाबादमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त औरंगाबादमध्ये असताना संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्रात पेटलेल्या दंगलींचे कारण काय असा प्रश्न विचारला असता, संजय राऊत म्हणाले, ज्या रझा अकादमी संघटनेद्वारे हे लोण पसरवलं जातंय, त्यामागे कोणता पक्ष आहे, हे सर्वश्रुत आहे. अनेक वर्षांपासून या संघटनेला भाजपचेचे खतपाणी आहे. आज महाराष्ट्रात सुरु असलेल्या जाळपोळ आणि दंगलींमागे कोण आहे, हे यावरून स्पष्ट होते. रझा अकादमी हे भाजपचंच पिल्लू आहे. त्यामुळे त्यांच्याच पाठिंब्याने त्रिपुरातलं लोण इथवर पोहोचलं आहे. अन्यथा तिकडे त्रिपुरात घडलेल्या दंगलींचे पडसाद इथे पडण्याचे काय कारण, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
त्रिपुरातील हिंसेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमरावती, नांदेड, परभणी, मालेगाव, नाशिकमध्ये मुस्लिमांनी प्रचंड मोर्चे काढत जोरदार आंदोलन केलं आहे. आज अमरावतीतदेखील जोरदार आंदोलन पेटलं आहे. काल काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. जमावाने पोलिसांवरच दगडफेक केल्याने पोलिसांनीही जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला.
इतर बातम्या-