Mumbai महापालिकेत सर्वात मोठा भ्रष्टाचार, सगळी लूट राजकीय आश्रयाशिवाय शक्य नाही : Amit Satam
मुंबईकर जेव्हा ॲाक्सिजन बेड, मास्क, औषध आणि स्वत:चा जीव वाचवण्यासाठी, कुटुंबीयांना वाचवण्यासाठी धडपडत होता, तेव्हा हे यशवंत जाधव (Yashwant Jadhav) मुंबईकरांची लूट करत होता, अशी टीका भाजपा (BJP) नेते आणि आमदार अमित साटम (Amit Satam) यांनी केली आहे.
मुंबईकर जेव्हा ॲाक्सिजन बेड, मास्क, औषध आणि स्वत:चा जीव वाचवण्यासाठी, कुटुंबीयांना वाचवण्यासाठी धडपडत होता, तेव्हा हे यशवंत जाधव (Yashwant Jadhav) मुंबईकरांची लूट करत होता, अशी टीका भाजपा (BJP) नेते आणि आमदार अमित साटम (Amit Satam) यांनी केली आहे. ते म्हणाले, की कोट्यवधी रुपयांच्या प्रॅापर्टीज कोविड भ्रष्टाचारातूनच जमा केल्या. महापालिकेला लाभलेले सर्वात भ्रष्ट अधिकाही हे चहल आणि वेलरासू आहेत, असे ते म्हणाले. हे वाझेगिरी करत आहेत. ही मुंबई महापालिकेची वीरप्पन गॅंग आहे. ही सगळी लूट राजकीय आश्रयाशिवाय शक्य नाही. यांच्यावर राजकीय आश्रय कोणाचा, असा सवाल त्यांनी केला. याचा टक्का कुठे कुठे जातोय, गेला त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अमित साटम यांनी केली.
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ

