तुमच्या पक्षाची किती फाटली… भाजप नेत्याने ठाकरे गटाची अक्षरश: काढली, जोरदार हल्लाबोल
BJP vs Shivsena UBT : भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यासह शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावर सडकून टीका केली आहे. बन यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सातत्याने भाजपवर टीका करत असतात. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी स्टॅलिन यांच्या एका विधानाचा संदर्भ देत भारतीय तरुणांचा उल्लेख मंद असा केला होता. यानंतर आता भाजपकडून संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यासह शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावर सडकून टीका केली आहे. नवनाथ बन यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
तुमच्या पक्षाची किती फाटली…
नवनाथ बन यांनी संजय राऊत आणि ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे. नवनाथ बन यांनी म्हटले की, संजय राऊत तुमच्या पक्षाची किती फाटली? जनतेने मताच्या माध्यमातून तुमची कशी वाट लावली ते बघा. मताच्या माध्यमातून विधानसभेत महापालिकेत पूर्ण फाडण्याच काम जनतेने केलं आहे. त्यामुळे विनाकारण न्याय व्यवस्थेवर टीका टिप्पणी करणं बंद करा. मूळ शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे मूळ राष्ट्रवादी अजित दादा सुनेत्रा पवार यांची आहे. यावर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे त्यावर लक्ष द्या.
तरूणाईने तुम्हाला झुरळासारखं चिरडलं आहे
पुढे बोलताना बन यांनी म्हटले की, तरुणांना मतिमंद झुरळ म्हणायचे धंदे बंद केले पाहिजे. तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला याच तरुणाईने झूरळासारखं विधानसभेला महापालिकेला चिरडलेलं आहे. येणाऱ्या काळात तरुणाईचा अपमान कराल तर ही तरुणाई झुरळासारखं वागणं करून टाकेल. झुरळाप्रमाणे तुम्हाला हिट मारून नायनाट केल्या शिवाय ही तरुणाई थांबणार नाही हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवावं.
तुमच्या पक्षाची रणनीती काय?
नवनाथ बन यांनी पुढे बोलताना म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसर आवाहन केलं त्यानंतर संजय राऊत यांनी नाव ठेवायला सुरुवात केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यटन करायला परदेशात गेले नाहीत, तर रणनीती आखायला गेले आहत. तुमच्या पक्षाची रणनीती काय? तरुणांना माथेफिरू, मंद म्हणण? पत्राचाळ घोटाळा करणं, सामनामध्ये खोटं लिहिणं तुमच्या पक्षाची रणनीती आहे. नरेंद्र मोदी यांची रणनीती देश प्रथम आणि देशाला पुढे घेऊन जाण आहे.
NEET पेपर फुटी प्रकरणी भाजपचा संबंध नाही
पुढे बोलताना नवनाथ बन यांनी सांगितले की, मोदी यांच्या रणनीतीवर शंका उपस्थित करू नका, तुमची रणनीती कशी फसली आहे ते बघा. NEET पेपर फुटी प्रकरणी भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला बेड्या ठोकण्याचं काम यंत्रणा मार्फत केलं जात आहे. ज्या पद्धतीने पेपर फुटी झाली परीक्षा रद्द करण्यात आली त्यानंतर प्रत्येकाला अटक करण्याचं करून कारवाई करण्याचं काम सुरू आहे. यामध्ये तुमचेही काही धागेदोरे असतील तेही तपासले जातील. विनाकारण वडाची साल पिंपळाला जोडण्याचं प्रयत्न संजय राऊत यांच्या मार्फत केला जात आहे.