AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत पोहचल्या 93 वर्षीय लीलाबाई, 1942 च्या भारत छोडो आंदोलनातही सहभाग

9 ऑगस्ट 1942 ला त्या 12 वर्षांच्या होत्या. महात्मा गांधी यांनी करो या मरोचा नारा दिला होता.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत पोहचल्या 93 वर्षीय लीलाबाई, 1942 च्या भारत छोडो आंदोलनातही सहभाग
| Updated on: Nov 18, 2022 | 8:33 PM
Share

बुलढाणा : काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील या यात्रेत 93 वर्षीय लीलाबाई चितळे सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे लीलाबाई चितळे यांनी भारत छोडो यात्रेत सहभाग घेतला होता. लीलाबाई गुरुवारी बाळापूरजवळ भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या. राहुल गांधींसह सर्व नेत्यांनी लीलाबाई यांचे फोटो शेअर केलेत.

राहुल गांधी यांनी ट्विट केलंय. 1942 च्या भारत छोडोपासून 2022 च्या भारत जोडोपर्यंत देशावर प्रेम करणारे संघर्षासाठी तयार आहेत. लीलाबाईजी, तुमचं कुटुंबाचं त्याग हे अमूल्य आहे. आपण कोणत्याही परिस्थितीत स्वातंत्र्य आणि संविधानासाठी संघर्ष करणार आहोत.

काँग्रेस नेता जयराम रमेश यांनी ट्वीट केलं. 93 वर्षीय लीलाबाई चितळे यांच्यासोबतची भेट प्रेरणादायी होती. त्यांनी 1942 च्या भारत छोटो आंदोलनात सहभाग घेतला होता. त्या बाळापूर येथील यात्रेत सहभागी झाल्या होत्या. संविधानाची सुरक्षा करणं आवश्यक आहे, असं त्यांना वाटते.

लीलाबाई या जेलमध्येही होत्या. लीलाबाई म्हणाल्या, 9 ऑगस्ट 1942 ला त्या 12 वर्षांच्या होत्या. महात्मा गांधी यांनी करो या मरोचा नारा दिला होता. त्या वयानं लहान असल्यानं त्यांना ताब्यात घेऊन सायंकाळी सोडून देण्यात आले होते. परंतु, त्यांच्या वडील व भावाला अटक करण्यात आली होती. त्यांना साडेतीन वर्षांची शिक्षा झाली होती. अशी 1942 ची गोष्ट त्यांनी राहुल गांधी यांना सांगितली. जुन्या आठवणींना लीलाबाई यांनी उजाळा दिला.

लीलाबाई म्हणाल्या, मी माझ्या दोन मैत्रिणींनी कॉलेजसमोर नारे दिले होते. त्यामुळं आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतले. संध्याकाळपर्यंत पोलीस चौकीत ठेवलं. पण, आम्ही १२ वर्षांच्या असल्यानं संध्याकाळी सोडून देण्यात आलं. स्वातंत्र्य काही सहज मिळालं नाही. त्यासाठी गरीब, श्रीमंतांनी सहकार्य केलं. सर्व धर्मचे लोकं महात्मा गांधी यांच्यासोबत होते.

मानवी शक्ती तयार झाल्यानं इंग्रजांना माघार घ्यावी लागली. इंग्रजांकडं सर्व आयुध होती. सर्व जण एकत्र आल्यानं इंग्रजांना परत जावं लागलं. जयराम रमेश यांच्यासारखे लोकं जे करत आहेत. ते खूप चांगलं आहे. उद्या मी कदाचित नसेन. पण, या माध्यमातून संविधानाची सुरक्षा केली जात असल्याचं त्या म्हणाल्या.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.