AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आमचे चिरंजीव पंकज कुठे गेले काय गेले….’ भुजबळांचा तानाजी सावंतांना खोचक टोला

दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. यावरून आता भुजबळांनी जोरदार टोला लगावला आहे.

'आमचे चिरंजीव पंकज कुठे गेले काय गेले....' भुजबळांचा तानाजी सावंतांना खोचक टोला
Follow us
| Updated on: Feb 12, 2025 | 5:35 PM

दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. या बातमीनं चांगलीच खळबळ उडाली. मात्र त्यानंतर ते बेपत्ता झाले नसून, आपल्या मित्रांसोबत बँकॉकला निघाल्याची बातमी समोर आली. मात्र त्यापूर्वी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क करून आपल्या मुलाचं विमान हवेतल्या हवेत फिरवून पुन्हा पुण्याला आणलं.  सध्या या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. आता राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी तानाजी सावंत यांना खोचक टोला लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ? 

आमचे चिरंजीव आमदार पंकज भुजबळ येवल्यातून कुठे गेले काहीच पत्ता नाही. आम्ही काल वाट बघत होतो.  आजकाल काही आमदारांचे मुलं कोण कुठे जाईल, कोण कुठे येईल काही पत्ताच लागत नाही. त्यानंतर मला कोणीतरी सांगितलं की काही नाही पंकज भुजबळ हे मंदिरात गेले आहेत म्हणून, मग मी म्हटलं काही हरकत नाही. पंकज भुजबळ कुठे नाही सापडले तरी ते मंदिरात नक्की सापडणार. आमच्या घरची मंडळी बराच वेळा इथे येतात. दरवर्षी किमान एकदा, कधी दोनदा वेळ काढून आम्ही गाणगापूरला जातो. तुळजापूर आणि पंढरपूर करूनच घरी परततो. असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत यांच्या प्रकरणात विरोधकांकडून देखील टीका होत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. मोहोळ यांनी फोनाफोनी करून हवेतील विमान परत बोलवलं. तेच मुरलीधर मोहोळ राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करण्यासाठी तत्परता का दाखवत नाहीत? केंद्रीय राज्यमंत्री पदाची पॉवर तिथं का वापरत नाहीत? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

गोवंडीत डंपरनं चिरडून तिघांचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाकडून ठिय्या
गोवंडीत डंपरनं चिरडून तिघांचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाकडून ठिय्या.
6 व्या दिवशी उपोषण सोडलं, बच्चू कडूंना सरकारकडून आश्वासनांचं पत्र
6 व्या दिवशी उपोषण सोडलं, बच्चू कडूंना सरकारकडून आश्वासनांचं पत्र.
मेडे, मेडे... पायलटचा असा होता शेवटचा मेसेज, Mayday म्हणजे नेमकं काय?
मेडे, मेडे... पायलटचा असा होता शेवटचा मेसेज, Mayday म्हणजे नेमकं काय?.
..अन् दुर्घटनेचा LIVE व्हिडिओ बनला, शूट करणाऱ्याच्या मित्रानं सांगितलं
..अन् दुर्घटनेचा LIVE व्हिडिओ बनला, शूट करणाऱ्याच्या मित्रानं सांगितलं.
इस्त्रायल-इराण संघर्ष पेटला, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?
इस्त्रायल-इराण संघर्ष पेटला, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?.
बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर..
बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर...
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय.
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी.
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ.
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?.