AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आमचे चिरंजीव पंकज कुठे गेले काय गेले….’ भुजबळांचा तानाजी सावंतांना खोचक टोला

दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. यावरून आता भुजबळांनी जोरदार टोला लगावला आहे.

'आमचे चिरंजीव पंकज कुठे गेले काय गेले....' भुजबळांचा तानाजी सावंतांना खोचक टोला
| Updated on: Feb 12, 2025 | 5:35 PM
Share

दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. या बातमीनं चांगलीच खळबळ उडाली. मात्र त्यानंतर ते बेपत्ता झाले नसून, आपल्या मित्रांसोबत बँकॉकला निघाल्याची बातमी समोर आली. मात्र त्यापूर्वी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क करून आपल्या मुलाचं विमान हवेतल्या हवेत फिरवून पुन्हा पुण्याला आणलं.  सध्या या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. आता राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी तानाजी सावंत यांना खोचक टोला लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ? 

आमचे चिरंजीव आमदार पंकज भुजबळ येवल्यातून कुठे गेले काहीच पत्ता नाही. आम्ही काल वाट बघत होतो.  आजकाल काही आमदारांचे मुलं कोण कुठे जाईल, कोण कुठे येईल काही पत्ताच लागत नाही. त्यानंतर मला कोणीतरी सांगितलं की काही नाही पंकज भुजबळ हे मंदिरात गेले आहेत म्हणून, मग मी म्हटलं काही हरकत नाही. पंकज भुजबळ कुठे नाही सापडले तरी ते मंदिरात नक्की सापडणार. आमच्या घरची मंडळी बराच वेळा इथे येतात. दरवर्षी किमान एकदा, कधी दोनदा वेळ काढून आम्ही गाणगापूरला जातो. तुळजापूर आणि पंढरपूर करूनच घरी परततो. असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत यांच्या प्रकरणात विरोधकांकडून देखील टीका होत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. मोहोळ यांनी फोनाफोनी करून हवेतील विमान परत बोलवलं. तेच मुरलीधर मोहोळ राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करण्यासाठी तत्परता का दाखवत नाहीत? केंद्रीय राज्यमंत्री पदाची पॉवर तिथं का वापरत नाहीत? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.