AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! सीजेपीचा सर्वात मोठा निर्णय, 5 सप्टेंबर रोजी दिल्लीत होणारं आंदोलन मागे

मोठी बातमी समोर येत आहे, सीजेपीच्या वतीने येत्या 5 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मोठं आंदोलन होणार होतं. मात्र आता हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. सुप्रीम कोर्टात तशी माहिती देखील देण्यात आली आहे.

मोठी बातमी! सीजेपीचा सर्वात मोठा निर्णय, 5 सप्टेंबर रोजी दिल्लीत होणारं आंदोलन मागे
सीजेपीचं आंदोलन मागे Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 01, 2026 | 3:09 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, सीजेपीच्या वतीने येत्या 5 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मोठं आंदोलन होणार होतं. मात्र आता हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. सीजेपीचे नेते सौरभ दास यांनी त्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात माहिती दिली आहे. नीट परीक्षा पेपर फुटीनंतर देशभरात चांगलंच वातावरण तापलं होतं. सरकारी यंत्रणेविरोधात संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर या प्रकरणात अभिजीत दिपके संस्थापक असलेल्या सीजेपी अर्थात कॉकरोच जनता पार्टीने उडी घेतली. कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी जतंर मंतरवर तब्बल एक महिन्यापेक्षा अधिककाळ आंदोलन सुरू होतं. संसदेवर मोर्चा देखील काढण्यात आला.

यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, आंदोलकांनी देखील पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप आहे. त्यानंतर अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर 25 जुलै रोजी हे आंदोलन मागे घेण्यात आलं होतं. यावेळी सरकारच्या वतीने आंदोलकांना काही आश्वासनं देखील देण्यात आले होते.  मात्र अजूनही या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने पुन्हा एकदा पाच सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र आता हे आंदोलन रद्द करण्यात आलं आहे.

दिल्लीच्या इंडिया गेटपासून ते पोलीस मुख्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र हा मोर्चा अवघ्या काही दिवसांवर असताना आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी पार पडली. सरकारच्या वतीने विद्यार्थ्यांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते गुन्हे मागे घेण्यासाठी आणि नुकसान भरपाईच्या मागणीसंदर्भात ही सुनावणी सुरू होती. यावेळी सरकारच्या बाजूने स्पष्ट करण्यात आलं की आम्ही गुन्हे मागे घेण्यास तयार आहोत, तसेच ज्या विद्यार्थ्यांनी नीट पेपर फुटी प्रकरणात आत्महत्या केल्या आहेत, त्यांच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यास देखील सरकार सकारात्मक आहे. त्यानंतर आम्ही हे आंदोलन मागे घेत आहोत, असं सौरभ दास यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं आहे.

Follow Us
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
Uday Samant | ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
Cabinet Meeting Update | मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मोठी खलबतं!
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
Subhash Chandra | सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील NCLTचा आदेश रद्द
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
OBC Morcha | ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक; मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम! 75 वर्षीय आजींच्या धैर्याची कहाणी थक्क करणारी
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत सर्वच महागलं
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
Sanjay Raut | भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर घणाघाती हल्ला