AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात नवा वाद, सावित्रीबाईंच्या नावाआधी साध्वी लिहिल्यानं संताप, समता सैनिक दलानं नावही झाकलं

पुण्यात नवा वाद, सावित्रीबाईंच्या नावाआधी साध्वी लिहिल्यानं संताप, समता सैनिक दलानं नावही झाकलं

पुण्यात नवा वाद, सावित्रीबाईंच्या नावाआधी साध्वी लिहिल्यानं संताप, समता सैनिक दलानं नावही झाकलं
PUNE SAVITRIBAI PHULE GARDEN
| Edited By: | Updated on: Sep 30, 2021 | 10:03 PM
Share

पुणे : पुण्यातील ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाजवळ महानगरपालिकेने एका उद्यानाला नाव देताना पाटीवर साध्वी सावित्रीबाई फुले असा उल्लेख केलाय. साध्वी या नावामुळे पुण्यात चांगलाच गजहब उडाला आहे. या नावाला समता सैनिक दल, तसेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र आक्षेप घेतलाय. समता सैनिक दलाने तर निळ्या शाईने साध्वी हे नाव झाकून टाकलं आहे. उद्यानाच्या नावावरुन पुण्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

नेमका प्रकार काय आहे ?

पुणे शहरात सध्या एका वादग्रस्त पाटीमुळे तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पुण्यातील ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाजवळ पुणे महानगरपालिकेने एका उद्यानाला नाव देताना पाटीवर साध्वी सावित्रीबाई फुले असा उल्लेख केलाय. या पाटीवरील सावित्रीबाईंच्या नावाअगोदर असलेल्या साध्वी या शब्दाला अनेकांनी आक्षेप घेतलाय. आदर्श व्यक्तींचे दैवतीकरण आणि हिंदुत्ववादी विशेषणे लावून धार्मिकीकरण करणे चुकीचे आहे अशा प्रतिक्रिया उमटत आहे. पाटीवरील साध्वी हा शब्द खोडावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. तसेच साध्वी शब्दावर आक्षेप घेत समता सैनिक दलाने सध्या हा शब्द झाकून टाकला आहे.

नाव बदला अन्यथा तीव्र आंदोलन

तसेच सावित्रीबाईंच्या नावाअगोदर क्रांतिज्योती विशेषण लावावे अशी मागणी समता सैनिक दलाने केली आहे. तसेच महापालिकेने उद्यानाच्या नावात त्वरित बदल केला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारादेखील देण्यात आला आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनीसुद्धा या नावावर आक्षेप घेतला होता. त्यांनी थेट शहराध्यक्षांना फोन करुन नाव बदलण्याचे सांगितले.

ठराव झाल्यानंतरच नाव दिलं जातं

या नावाबाबत कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे. साध्वी सावित्रीबाई फुले असं नामफलक असलेली पाटी आता  काही लोकांच्या नजरेत आली आहे. महापालिकेत नाव ठरावण्याबाबत एक कमिटी असते. त्याच्यात ठराव झाल्यानंतरच त्या उद्यानाला रस्त्याला नाव दिलं जातं. विजयसिंह मोहिते मंत्री असताना 1991 साली ही कोनशिला लावण्यात आली आहे. हे जरी त्यावेळेस करण्यात आलं असलं तरी या उद्यानाला साध्वी सावित्रीबाई फुले हे नाव का देण्यात आलं हे शोधण्याची गरज आहे. काँग्रेसच्या काळात साध्वी हे नाव या उद्यानाला देण्यात आलं आहे. पालिकेच्या कमिटीत हे नाव का दिलं होत का ? हे शोधण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया सरोदे यांनी दिली.

पालिकेने नाव बदलून दुसरी पाटी लावावी 

तसेच हे नाव त्याकाळी देण्यात आलं असलं तरी हे नाव आक्षेपार्ह आहे. कारण सावित्रीबाई फुले या रचनात्मक काम करणाऱ्या व्यक्ती आहे. सावित्रीबाई यांना साध्वी म्हणणे म्हणजे त्यांना एका धर्मात बांधल्या सारखं आहे. त्यामुळे त्यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असं आपण म्हणू शकतो. कारण त्यांनी क्रांती घडून आणली होती. त्यामुळे आता महापालिकेने ते नाव बदलून दुसरी पाटी लावावी, अशी मागणी सरोदे यांनी केली आहे.

इतर बातम्या :

लातूरच्या स्वप्नालीचा वर्ल्ड रेकॉर्ड, सलग 4 तासांत गायली 92 गाणी, लता मंगेशकर यांना अनोखा नजराणा

पुणे महापालिकेकडे 1.50 रुपयांची सिरींज नसणं दुर्दैव, सत्ताधाऱ्यांचा भोंगळ कारभार सुरु, प्रशांत जगताप यांचा आरोप

कर संकलन मजबूत, ऑगस्टमध्ये वित्तीय तूट मोठ्या प्रमाणात घसरली, तरीही 4.68 लाख कोटींच्या कर्जाचा बोजा

(clash on pune garden name prakash ambedkar and samta sainik dal opposes name sadhvi savitribai fule)

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?.

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट