AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Climate change : वातावरण बदलाचा शेतकऱ्यांना फटका, पिकांची नासाडी तर फळांना कीड

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव-खडकी येथे गारांच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

Climate change : वातावरण बदलाचा शेतकऱ्यांना फटका, पिकांची नासाडी तर फळांना कीड
Climate changeImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Apr 16, 2023 | 12:45 PM
Share

महाराष्ट्र : नांदेडमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) ढगाळ वातावरण यासारख्या सातत्याने बदलणाऱ्या हवामानाचा (Climate change) भुईमुंगाच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. भुईमुंग पिकाला अपेक्षित अशी फळधारणा झाली नसल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर उन्हाळी भुईमुगाच्या पिकाकडून (Groundnut crop) शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा होती. मात्र अस्मानी संकटामुळे भुईमूग पिकावर केलेला खर्च ही वसूल होण्याची चिन्हे दिसने झालीत असं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे नांदेड मधला भुईमूग उत्पादक शेतकरी हवालदिल बनला आहे.

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. मनाठा गावातील कामाई नगर आणि नई अबादी भागात नळाला पाणीचं येत नाही. 2016 साली मुख्यमंत्री पेयजल योजनेतुन दोन जलकुंभ बांधण्यात आले. पण पाईप लाईनमध्ये लिकेज असल्याने या भागांना पाणी येत नाही. या भागांतील नागरिकांना एक किलो मीटर अंतरावरील शेतातील विहीरीतून पाणी आणावं लागतं आहे. ग्रामपंचायतीने अनेक ठिकाणी बोअर मारले पण पाणी लागलं नाही. दरम्यान प्रशासनाने टंचाई निवारनासाठी उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी आहे.

सलग दुसऱ्या आठवड्यात पुन्हा गारपीट झाल्याने बीड जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. आष्टी तालुक्यातील अरणविहरा, हारेवाडी, मराठवाडी, पिंपळगाव घाटसह तब्बल 12 गावात गारपीठ झाली. गारपीठ एवढी मोठी होती की अक्षरशः हिमालयाचे स्वरूप शेतात पहावयास मिळाले. तर सर्वात जास्त फटका अरणविहरा गावाला बसला असून अनेक घरांचे पत्रे उडून गेले असून भिंती कोसळल्या आहेत. तर या घरात अजूनही गारांचा खच बघायला मिळतोय.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव-खडकी येथे गारांच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह तूफान गारांचा मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी झाल्याने शेतकऱ्याची मोठी आर्थिक हानी झाली आहे. ह्या परिसरात कांदा काढणीची लगबग सुरू असल्याने गारांमुळे कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. साठवणुकीसाठी वखारीत ठेवलेला कांदा पावसाच्या पाण्यामुळे भिजल्याने आणि शेतातील बागायती तसेच चारापिके उध्वस्त झाल्यामुळे शेतकरी कोलमडून पडला आहे.

Follow Us
13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी...
CET Exam Scam | 13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी परीक्षेबाबत पालकांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपने खळबळ
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...  प्रफुल पेटल आणि शरद पवार भेटीची इनसाइड स्टोरी
बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात...
CET Exam Scam | बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात महाघोटाळ्याच्या आरोपांनी खळबळ!
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट चर्चेत
जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण?
CJP Protest | जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण कहाणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवलं अन् दीड वर्षाचा... काय घडलं?
शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Raut on NCP | शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले, थेट...
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल