AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Climate change : वातावरण बदलाचा शेतकऱ्यांना फटका, पिकांची नासाडी तर फळांना कीड

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव-खडकी येथे गारांच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

Climate change : वातावरण बदलाचा शेतकऱ्यांना फटका, पिकांची नासाडी तर फळांना कीड
Climate changeImage Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 16, 2023 | 12:45 PM
Share

महाराष्ट्र : नांदेडमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) ढगाळ वातावरण यासारख्या सातत्याने बदलणाऱ्या हवामानाचा (Climate change) भुईमुंगाच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. भुईमुंग पिकाला अपेक्षित अशी फळधारणा झाली नसल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर उन्हाळी भुईमुगाच्या पिकाकडून (Groundnut crop) शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा होती. मात्र अस्मानी संकटामुळे भुईमूग पिकावर केलेला खर्च ही वसूल होण्याची चिन्हे दिसने झालीत असं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे नांदेड मधला भुईमूग उत्पादक शेतकरी हवालदिल बनला आहे.

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. मनाठा गावातील कामाई नगर आणि नई अबादी भागात नळाला पाणीचं येत नाही. 2016 साली मुख्यमंत्री पेयजल योजनेतुन दोन जलकुंभ बांधण्यात आले. पण पाईप लाईनमध्ये लिकेज असल्याने या भागांना पाणी येत नाही. या भागांतील नागरिकांना एक किलो मीटर अंतरावरील शेतातील विहीरीतून पाणी आणावं लागतं आहे. ग्रामपंचायतीने अनेक ठिकाणी बोअर मारले पण पाणी लागलं नाही. दरम्यान प्रशासनाने टंचाई निवारनासाठी उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी आहे.

सलग दुसऱ्या आठवड्यात पुन्हा गारपीट झाल्याने बीड जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. आष्टी तालुक्यातील अरणविहरा, हारेवाडी, मराठवाडी, पिंपळगाव घाटसह तब्बल 12 गावात गारपीठ झाली. गारपीठ एवढी मोठी होती की अक्षरशः हिमालयाचे स्वरूप शेतात पहावयास मिळाले. तर सर्वात जास्त फटका अरणविहरा गावाला बसला असून अनेक घरांचे पत्रे उडून गेले असून भिंती कोसळल्या आहेत. तर या घरात अजूनही गारांचा खच बघायला मिळतोय.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव-खडकी येथे गारांच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह तूफान गारांचा मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी झाल्याने शेतकऱ्याची मोठी आर्थिक हानी झाली आहे. ह्या परिसरात कांदा काढणीची लगबग सुरू असल्याने गारांमुळे कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. साठवणुकीसाठी वखारीत ठेवलेला कांदा पावसाच्या पाण्यामुळे भिजल्याने आणि शेतातील बागायती तसेच चारापिके उध्वस्त झाल्यामुळे शेतकरी कोलमडून पडला आहे.

Follow Us
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा.
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून.
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु.
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत.
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद....
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद.....
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता.
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद.....
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद......
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला.
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना....
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना.....
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल.