CM Devendra Fadnavis : ‘तुमसे ना हो पायेगा’ या आंदोलनावरुन फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना मनाला लागेल असं सुनावलं

CM Devendra Fadnavis : आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. त्या निमित्ताने उद्धव ठाकरे मराठवाड्यात येणार आहेत. मराठवाड्यातील प्रश्नांवर, समस्यांवर ते आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी 'तुमसे ना हो पायेगा' नाव दिलं आहे. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.

CM Devendra Fadnavis : तुमसे ना हो पायेगा या आंदोलनावरुन फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना मनाला लागेल असं सुनावलं
Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
| Updated on: Sep 17, 2026 | 11:46 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनासाठी आज मराठवाड्यात आले होते. “पावसाचा मोठा खंड पडल्याने मराठवाड्यासह इतर भागात पीकं धोक्यात आली आहेत. एनडीआरएफ कायद्यानुसार अधिकृत पंचनामे 5 ऑक्टोंबर नंतर करावे लागतील, तर ते ग्राह्य धरले जातील. पण तो पर्यंत आम्ही थांबलेलो नाही. त्वरित पंचनामे पूर्ण करुन दुष्काळाच्या उपायोजना सुरु करत आहोत. शेतकऱ्यांना थेट मदत करणं असेल. पिण्याच पाणी, जनावरांना चारा दुष्काळाच्या सर्व उपायोजना ज्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे, तिथे करणार आहोत. राज्य सरकारने तयारी करुन ठेवली आहे. अडचणीची परिस्थिती असली, तरी निश्चितपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आज मराठवाड्यात आहेत. उद्धव ठाकरे आज मराठवाड्यातील प्रश्नांवर, समस्यांवर आंदोलन करणार आहेत.

या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी ‘तुमसे ना हो पायेगा’ नाव दिलं आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं. “हे नाकार्त्यांचं आंदोलन आहे. ज्यांनी आपल्या जीवनात काहीच केलं नाही. संधी मिळाली तरी काही केलं नाही अशा नाकार्त्यांच हे आंदोलन आहे. आम्ही यापूर्वीही करुन दाखवलं आहे. आता यापुढेही करुन दाखवू. मराठवाड्याला जो शब्द दिला आहे, तो पूर्ण करुन. ज्यावेळी आम्ही बोललेलो मराठवड्याला फ्लड मिटिगेशनच पाणी आणू. त्यावेळी आम्हाला मूर्खात काढलेलं. आम्ही ते करुन दाखवले. आम्ही त्याचं टेंडर काढलं, वर्ल्ड बँकेकडून मान्यता मिळवली. त्याचे पैसे देखील मिळाले” असं फडणवीस यांनी सांगितलं.

हे फक्त बोलघेवडे

“मराठवाड्याच्या इतिहासातलं मोठं असेल ते म्हणजे कोकणातलं पाणी या ठिकाणी आणायचं आहे. त्याचा डीपीआर करुन ठेवलेला आहे. डीएमआयसी कोणी केली, उद्योग कोणी आणले?. छत्रपती संभाजीनगर, जालना हे देशातलं ईव्हीचं मॅग्नेट झालय. हे कोणामुळे झालं? तुम्ही केवळ विरोध करत राहा. हे नाकार्त्यांच आंदोलन आहे. तुम्ही फक्त बोलत राहा हे बोलघेवडे आहेत” अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us