AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cm Eknath Shinde : नव्या सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, प्रतिहेक्टर 13 हजार 600 रुपयांची मदत जाहीर

एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे 6 हजार 800 मिळत होती. त्यापेक्षा दुप्पट मदत आम्ही देणार आहोत. म्हणजे प्रतिहेक्टर 13600 रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलीय.

Cm Eknath Shinde : नव्या सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, प्रतिहेक्टर 13 हजार 600 रुपयांची मदत जाहीर
नव्या सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, प्रतिहेक्टर 13 हजार 600 रुपयांची मदत जाहीरImage Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Aug 10, 2022 | 5:48 PM
Share

मुंबई : नव्या मंत्रिमंडळाची आज एक महत्वाची बैठक (Cabinet Meeting)पार पडली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यात 15 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या (Farmer Help) मागणीनुसार, त्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेना भाजप सरकारने विशेष बाब म्हणून आतापर्यंत कधीही नुकसान भरपाई मिळाली नाही तेवढी, म्हणजे एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जी मदत दिली जात होती त्याच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय झालाय. तसच दोन हेक्टरची मर्यादा वाढवून आम्ही ती 3 हेक्टर केली आहे. हा एक मोठा निर्णय आम्ही घेतलाय. एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे 6 हजार 800 मिळत होती. त्यापेक्षा दुप्पट मदत आम्ही देणार आहोत. म्हणजे प्रतिहेक्टर 13600 रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलीय. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

गेल्या अनेक दिवसात राज्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलेलं आहे. अनेक भागातील शेतकऱ्यांची पीक ही अतिवृष्टीमुळे पाण्यात गेलेली आहेत. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला होता. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून तसेच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडून वारंवार होत होती. गेल्या काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती, तसेच अजित पवार यांनीही नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला होता. त्यानंतर काल नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि आज शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तुर्तास तरी दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या पुन्हा पिकं उभी करण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे.

कॅबिनेटमधील दुसरा महत्वाचा निर्णय

आजच्या कॅबिनेटमध्ये आणखी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. तो म्हणजे मेट्रो 3 बाबत वाढलेली किंमत मंजूर करण्यात आलीय. गेल्या काही काळात हा प्रकल्प रखडल्याने 10 हजार कोटींनी किंमत वाढली आहे. आता 33 हजार कोटी किंमतीचा हा प्रकल्प झाला आहे. जो 23 हजार कोटीची किंमतीचा होता, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलीय.  तसेच या प्रकल्पाची 85 टक्के कामे पूर्म झाली आहेत. तर कार डेपोचं काम 29 टक्के पूर्ण झालेले आहे, ते मार्गी लावायचे आहे, 2023 साली पहिला फेज सुरु करायचा आहे, असेही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितलेलं आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत