AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला, आज 831 रुग्ण सापडले

तसेच बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलेय. त्याशिवाय मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीतही वाढ झाली. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. Corona Virus Mumbai 01 june 2021

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला, आज 831 रुग्ण सापडले
Corona Virus
| Edited By: | Updated on: Jun 01, 2021 | 9:26 PM
Share

मुंबईः कोरोनाची तिसरी लाट आणि ब्लॅक फंगसचं (Black fungus) थैमान घातल्यामुळे महाराष्ट्रात 15 जूनपर्यंत लॉकडाऊन (Maharashtra lockdown) वाढवण्यात आलाय. आता त्यामध्ये शिथीलता आणण्याच्या हालचाली सुरू असल्या तर काही जिल्हे अजूनही रेड झोनमध्ये (Red zone) आहेत. दुसरीकडे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेली मुंबई कोरोनाच्या विळख्यातून मुक्त होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तसेच बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलेय. त्याशिवाय मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीतही वाढ झाली. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. (Corona Virus Mumbai Great Relief To Mumbaikars! Today Only 831 Patients Were Found In Mumbai 1 June 2021)

मुंबई आज फक्त 831 रुग्ण सापडलेत

मुंबई आज फक्त 831 रुग्ण सापडलेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यांदाच रुग्णसंख्या एवढी खाली आलीय. तसेच मुंबईतल्या मृतांच्या आकड्यातही घसरण नोंदवली गेलीय. मुंबईत आज 23 जणांचा मृत्यू झालाय. मुंबईत आज फक्त 831 चाचण्या पॉझिटिव्ह आल्यात.

मुंबई शहरासह उपनगरात दिवसभरात 5868 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत

मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची घट होत आहे. तर मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 95 टक्क्यांवर पोहोचलाय. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 453 दिवसांवर गेलाय. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई शहरासह उपनगरात दिवसभरात 5868 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. तर आतापर्यंत एकूण 6 लाख 72 हजार 664 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. त्यामुळे सध्या मुंबईत 17 हजार 328 रुग्ण सक्रिय आहे. मुंबईत दिवसभरात 831 रुग्णांची नोंद झालीय.

राज्यात आज 14,123 नवीन रुग्णांचे निदान

राज्यात आज 14,123 नवीन रुग्णांचे निदान झाले असून, राज्यात आज 477 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मृत्यूदर हा 1.67 टक्के एवढा झालाय. राज्यात आज 14,123 नवीन रुग्ण सापडल्यानंतर आज रोजी एकूण 2,30,681 सक्रिय रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 57,61,015 झालीय.

राज्यात आज 35,949 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत

राज्यात आज 35,949 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, राज्यात आजमितीस एकूण 54,31,319 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.28 % एवढे झाले. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,52,77,653 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57,61,015 (16.33 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत. सध्या राज्यात 17,68,119 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 9,315 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांसाठी दोन डोसमधील कालावधी कमी करा, मुंबई मनपाचं केंद्राला पत्र

Ratnagiri Lockdown : रत्नागिरीत 8 दिवस अत्यंत कडक लॉकडाऊन, दूध, किराणाही घरपोच मागवा!

Corona Virus Mumbai Great Relief To Mumbaikars! Today Only 831 Patients Were Found In Mumbai 1 June 2021

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.