AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! महाराष्ट्रातील 30 हजार शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार; शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ

राज्यातील २० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांमधील ३०,००० शिक्षकांवर अतिरिक्त होण्याचे संकट ओढावले असून, १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार शिक्षण विभागाने समायोजन प्रक्रिया सुरू केली आहे.

धक्कादायक! महाराष्ट्रातील 30 हजार शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार; शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ
teacher
| Updated on: Apr 24, 2026 | 8:27 AM
Share

महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात सध्या चिंतेचे वातावरण पसरले आहे. राज्यातील अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील तब्बल ३० हजार शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार असल्याचे बोललं जात आहे. अनुदानित आणि जिल्हा परिषद शाळांमधील हे शिक्षक अतिरिक्त (Surplus) ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कमी होत असलेली पटसंख्या आणि बदलणारे शैक्षणिक नियम यामुळे या शिक्षकांच्या भविष्यावर टांगती तलवार आली असून, शिक्षण वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत

नेमकी परिस्थिती काय?

राज्यात सध्या १ लाख ८ हजार ३५ शाळा असून, तिथे २ कोटींहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी साधारण ७ लाख ४६ हजार ३७७ शिक्षक कार्यरत आहेत. ही आकडेवारी मोठी वाटत असली, तरी सूक्ष्म स्तरावर चित्र वेगळे आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत झपाट्याने घट होत आहे. काही शाळांमध्ये केवळ १० ते १५ विद्यार्थीच उरले आहेत, तर तिथे शिक्षकांची संख्या मात्र मंजूर पदांनुसार जास्त आहे.

शासनाचा १५ मार्च २०२४ चा निर्णय

या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने १५ मार्च २०२४ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार (GR), ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे, अशा शाळांमधील शिक्षकांना अतिरिक्त ठरवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नियमानुसार विद्यार्थी आणि शिक्षकांचे प्रमाण व्यस्त झाल्याने या शिक्षकांचे समायोजन दुसऱ्या शाळांमध्ये करावे लागणार आहे. या निर्णयामुळे शिक्षकांच्या नोकरीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना लांबच्या शाळांमध्ये बदली स्वीकारावी लागेल किंवा त्यांच्या सेवा ज्येष्ठतेवर याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः ग्रामीण भागात काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये यामुळे मोठी अस्वस्थता आहे.

शिक्षक संघटनांची भूमिका

शिक्षक संघटनांनी या धोरणात्मक निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. त्यांच्या मते, शाळांमधील पटसंख्या कमी होण्यामागे अनेक सामाजिक आणि भौगोलिक कारणे आहेत. केवळ शिक्षकांना अतिरिक्त ठरवून प्रश्न सुटणार नाही, तर सरकारने शाळांची गुणवत्ता वाढवून विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवली पाहिजे, अशी मागणी संघटनांनी केली आहे. आता येत्या शैक्षणिक वर्षात या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन कसे केले जाते आणि सरकार शिक्षक संघटनांच्या मागणीवर काय तोडगा काढते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

शिक्षण विभागाचे पुढील पाऊल?

शिक्षण विभाग सध्या शाळांमधील संचमान्यता (Staff Fixation) अंतिम करण्याच्या प्रक्रियेत आहे. ३० हजार हा आकडा प्राथमिक अंदाजावर आधारित असून, प्रत्यक्ष पडताळणीनंतर यात बदल होऊ शकतो. मात्र, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे वेतन रोखले जाणार नाही, असे आश्वासन प्रशासनाकडून दिले जात असले तरी, बदल्यांच्या धास्तीने शिक्षकांमध्ये अस्वस्थता कायम आहे.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप