AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! महाराष्ट्रातील 30 हजार शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार; शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ

राज्यातील २० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांमधील ३०,००० शिक्षकांवर अतिरिक्त होण्याचे संकट ओढावले असून, १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार शिक्षण विभागाने समायोजन प्रक्रिया सुरू केली आहे.

धक्कादायक! महाराष्ट्रातील 30 हजार शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार; शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ
teacher
| Updated on: Apr 24, 2026 | 8:27 AM
Share

महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात सध्या चिंतेचे वातावरण पसरले आहे. राज्यातील अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील तब्बल ३० हजार शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार असल्याचे बोललं जात आहे. अनुदानित आणि जिल्हा परिषद शाळांमधील हे शिक्षक अतिरिक्त (Surplus) ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कमी होत असलेली पटसंख्या आणि बदलणारे शैक्षणिक नियम यामुळे या शिक्षकांच्या भविष्यावर टांगती तलवार आली असून, शिक्षण वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत

नेमकी परिस्थिती काय?

राज्यात सध्या १ लाख ८ हजार ३५ शाळा असून, तिथे २ कोटींहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी साधारण ७ लाख ४६ हजार ३७७ शिक्षक कार्यरत आहेत. ही आकडेवारी मोठी वाटत असली, तरी सूक्ष्म स्तरावर चित्र वेगळे आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत झपाट्याने घट होत आहे. काही शाळांमध्ये केवळ १० ते १५ विद्यार्थीच उरले आहेत, तर तिथे शिक्षकांची संख्या मात्र मंजूर पदांनुसार जास्त आहे.

शासनाचा १५ मार्च २०२४ चा निर्णय

या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने १५ मार्च २०२४ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार (GR), ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे, अशा शाळांमधील शिक्षकांना अतिरिक्त ठरवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नियमानुसार विद्यार्थी आणि शिक्षकांचे प्रमाण व्यस्त झाल्याने या शिक्षकांचे समायोजन दुसऱ्या शाळांमध्ये करावे लागणार आहे. या निर्णयामुळे शिक्षकांच्या नोकरीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना लांबच्या शाळांमध्ये बदली स्वीकारावी लागेल किंवा त्यांच्या सेवा ज्येष्ठतेवर याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः ग्रामीण भागात काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये यामुळे मोठी अस्वस्थता आहे.

शिक्षक संघटनांची भूमिका

शिक्षक संघटनांनी या धोरणात्मक निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. त्यांच्या मते, शाळांमधील पटसंख्या कमी होण्यामागे अनेक सामाजिक आणि भौगोलिक कारणे आहेत. केवळ शिक्षकांना अतिरिक्त ठरवून प्रश्न सुटणार नाही, तर सरकारने शाळांची गुणवत्ता वाढवून विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवली पाहिजे, अशी मागणी संघटनांनी केली आहे. आता येत्या शैक्षणिक वर्षात या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन कसे केले जाते आणि सरकार शिक्षक संघटनांच्या मागणीवर काय तोडगा काढते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

शिक्षण विभागाचे पुढील पाऊल?

शिक्षण विभाग सध्या शाळांमधील संचमान्यता (Staff Fixation) अंतिम करण्याच्या प्रक्रियेत आहे. ३० हजार हा आकडा प्राथमिक अंदाजावर आधारित असून, प्रत्यक्ष पडताळणीनंतर यात बदल होऊ शकतो. मात्र, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे वेतन रोखले जाणार नाही, असे आश्वासन प्रशासनाकडून दिले जात असले तरी, बदल्यांच्या धास्तीने शिक्षकांमध्ये अस्वस्थता कायम आहे.

Follow Us
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?