AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ST accident: खराब रस्त्यामुळे एसटी झाली पलटी, अक्कलकोट तालुक्यातील धक्कादायक घटना, बसमध्ये होते 50 प्रवासी

सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही, मात्र काही जण या अपघातात जखमी झाले आहेत, तर काही जणांना मुका मार बसला आहे. या सगळ्यांना उपचारासाठी तातडीने जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. केवळ खराब रस्त्यामुळे हा अपघात घडल्याने, प्रवाशांनाही सुरुवातीला नेमकं काय घडलं हे कळलं नाही.

ST accident: खराब रस्त्यामुळे एसटी झाली पलटी, अक्कलकोट तालुक्यातील धक्कादायक घटना, बसमध्ये होते 50 प्रवासी
Solapur ST accidentImage Credit source: TV 9 marathi
| Edited By: | Updated on: May 20, 2022 | 2:44 PM
Share

सोलापूर – खराब रस्त्यामुळे (bad road)एसटीच्या ड्रायव्हरचं (ST bus driver)नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची धक्कादायक घटना (shocking accident)समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोटहून कल्लाप्पावाडीकडे बस जात असताना हा अपघात घडला. खराब रस्ता होता, त्यामुळे एसटी ड्रायव्हरला वेग नियंत्रित करणं अवघड झालं, अशा स्थितीत त्याचा एसटीवरील ताबा सुटला, आणि बस थेट पलटली. या बसमध्ये सुमारे ५० प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही, मात्र काही जण या अपघातात जखमी झाले आहेत, तर काही जणांना मुका मार बसला आहे. या सगळ्यांना उपचारासाठी तातडीने जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. केवळ खराब रस्त्यामुळे हा अपघात घडल्याने, प्रवाशांनाही सुरुवातीला नेमकं काय घडलं हे कळलं नाही. प्रवाशी चांगलेच भेदरलेल्या अवस्थेत होते.

कसा झाला अपघात ?

अक्कलकोटवरुन एसी बस सकाळच्या वेळी कल्लाप्पावाडीकडे चालली होती. कल्लाप्पावाडीजवळील रस्ता खराब आहे. या ठिकाणी वेगात आलेल्या एसटीच्या ड्रायव्हरला गाडीवर नियंत्रण करता आले नाही. खराब रस्ता होता. त्यामुळे वेग नियंत्रित करण्याच्या प्रयत्नात त्याने जोरात ब्रेक मारला. मात्र ब्रेक इतक्या जोरात झालगा की, बस शेजारी असलेल्या शेतामध्ये पलटी झाली. या बसमध्ये ५० प्रवासी प्रवास करत होते. काही कळायच्या आतच बस पलटल्याने त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. स्थानिकांनी आणि शेतात काम करणारे, रस्त्यावरुन प्रवास करणारे मदतीसाठी सरसावले. सुदैवाने या अपघातात जिवीतहानी झाली नाही, मात्र काही जण जखमी झाले आहेत. तर काही जणांना मुका मार बसला आहे. त्यानंतर तातडीने त्या ठिकाणी एम्ब्युलन्स बोलावण्यात आली जखमींना तातडीने गावातच असेलल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

खराब रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण अधिक

खराब रस्त्यांमुळे अपघात होण्याचे प्रमाण राज्यात कमी नाही. नेहमीच खराब रस्त्यांमुळे मोठमोठे अपघात होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. राज्यात ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी रस्ते चांगल्या स्थितीत नाहीत. त्याचा फटका वाहनचालकांना नेहमीच बसतो. अनेकांची आयुष्य यात नासली जातात. एसटीसारख्य मोठ्या वाहनाचा अपघात सोलापुरात होत असताना, स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे ग्रामस्थ आणि प्रवाशांनी सांगितले आहे. राज्यातील रस्त्यांच्या दुर्दशेकेडे गांभिर्याने पाहण्याची गरज व्यक्त होते आहे. 

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.