मध्यरात्री एकनाथ शिंदे अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी, भेटीचं कारण आलं समोर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमागचं कारण आता समोर आलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल बुधवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये 20 मिनिटे बैठक चालली. महायुतीतील दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये महत्त्वाच्या विषयावर बैठक झाली. या भेटीमागचं कारण आता समोर आलं आहे.
राज ठाकरेंनी सकाळी भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोघांमध्ये २० मिनिटं बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत रायगड पालकमंत्रीपद , दोन आठवड्यात राज्यातील महामंडळ वाटप, शिवसेनेच्या आमदारांना विकास काम निधी आणि रखडलेल्या कामांना गती देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
एककीकडे सुप्रीम कोर्टात शिवसेना कोणाचीय याबाबत सुनावणी सुरू हे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल जोरदार युक्तिवाद करत आहे. त्यामुळे महायुतीच्या गोटातही हालचालींना वेग आएला आहे. त्यात दोन जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
फडणवीसांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर जोरदार टीका केली. देशात विरोधकांना फक्त राजकारण करायचं असून त्यांना संसदेत चर्चा करायची नाही. त्यांना फक्त स्टंटबाजी करण्यातच रस आहे. खरतंर विरोधकांना प्रश्नाचं उत्तर हवं आहे की, फक्त राजीनामा मागण्याचे नाटक करायचं आहे, असा सवाल एकनाथ शिंदेनी उपस्थित केला. भारतातील जनतेला सर्वांचं काम माहीत असून देशांने पंतप्रधान मोदींची काम पाहिलं आहे. अमित शहा यांचही काम जनतेला माहीत आहे. त्यामुळे देशातील 140 कोटी जनता मोदींजीसोबत आहे. युवक, तरुणी पिढी देशाचं भविष्य आहे. त्यांच्यासाठी मोदींनी पटापट निर्णय घेतले आहेत’.