महायुतीत एकनाथ शिंदे यांना पुन्हा डावलले, नवीमुंबईतील शिवरायांच्या पुतळा अनावरण सोहळ्याचे निमंत्रण दिले नाही

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा दिना निमित्ताने नवी मुंबई विमानतळावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डावलल्याने ते नाराज असल्याचे म्हटले जात आहेत.

महायुतीत एकनाथ शिंदे यांना पुन्हा डावलले, नवीमुंबईतील शिवरायांच्या पुतळा अनावरण सोहळ्याचे निमंत्रण दिले नाही
Devendra Fadnavis and Eknath Shinde
| Updated on: Jun 06, 2026 | 10:54 PM

राज्यात सत्तांतर घडवण्यात महत्वाचे ठरलेल्या आणि भाजपाला सत्तेचे सोपान देण्यात हुकमी एक्का ठरलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वजन आता महायुती कमी झाल्याचे वारंवार दिसून येत आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजाच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्ताने नवीमुंबईत विमानतळावर शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आल्या त्या सोहळ्या एकनाथ शिंदे यांना निमंत्रण न दिल्याचे उघडकीस आले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मात्र, एकनाथ शिंदे यांना या कार्यक्रमाची माहिती दिलीच नसल्याचे उघडकीस आले आहे.

नवी मुंबई येथील नव्या विमानतळावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाची माहिती एकनाथ शिंदे यांना दिली गेली नाही असे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांना या सोहळ्यात जाणीवपूर्वक डावल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

विधान परिषद निवडणुकीत आपल्या पक्षाला जास्त उमेदवार मिळावेत यासाठी एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन भाजपाचे नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. देवेंद्र फडणवीस आपल्याला दाद देत नाहीत अशी तक्रार दिल्लीला जाऊन एकनाथ शिंदे वारंवार करत आहेत. त्यामुळे उभय नेत्यांमध्ये सौहार्दाचे संबंध आता राहिलेले नाहीत.

शतप्रतिशत भाजपा

मुंबई महानगर पालिका जिंकल्यानंतर आता भाजपाला साल २०२९ च्या लोकसभा निवडणूक शतप्रतिशत भाजपा अशा लढवायच्या आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी महायुतीत राहून आपल्या पक्षांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मराठवाड्यात आपले पूत्र श्रीकांत शिंदे यांना पाठवून पक्षाचा विस्तार करण्याची हालचाली सुरु केल्या आहेत .त्यातच आता अनेक वेळा महायुतीत त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Follow Us