Alert : 3 नंबरचा बावटा जारी, समुद्रकिनाऱ्यावर वादळी वारे, मोठी भरती, खोल समुद्रात..

राज्यभरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. शेतीच्या कामांना वेग आला. पुढील 4 दिवस अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. यादरम्यानच आता मच्छिमारांसाठी मत्स्यविभागाकडून 3 नंबरचा बावटा लावला आहे.

Alert : 3 नंबरचा बावटा जारी, समुद्रकिनाऱ्यावर वादळी वारे, मोठी भरती, खोल समुद्रात..
Alert
| Updated on: Jul 02, 2026 | 10:08 AM

राज्यभरात जोरदार पाऊस कोसळत आहेत. अनेक भागात रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला. समुद्राला मोठी भरती आली. पुढील 4 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून पाऊस कोसळत आहे. यादरम्यानच आता रत्नागिरी मच्छिमारांसाठी मत्स्यविभागाकडून 3 नंबरचा बावटा जारी केला आहे. रत्नागिरीच्या मिलकर वाडा किनारपट्टी भागात लावला गेला बावटा.
किनारपट्टी भागात वादळी परिस्थितीमुळे मत्स्य खात्याकडून बावटा लावून सूचना जारी करण्यात आली. यादरम्यान समुद्रकिनाऱ्याच्या दूरच राहवे. पुढील चार दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. समुद्राला मोठी भरती आहे.
खोल समुद्रात वादळी परिस्थिती आहे.

मच्छिमारांसाठी मत्स्यविभागाकडून 3 नंबरचा बावटा लावला आहे. समुद्रकिनाऱ्यावर वादळी वाऱ्याचा अंदाज आहे. खोल समुद्रात मच्छिमारीसाठी जावू नये, असे हवामान विभागाचे आवाहन केले. पुढील काही तासात स्थिती अधिक गंभीर होण्याचा अंदाज आहे. यादरम्यानच मत्स्यविभागाकडून 3 नंबरचा बावटा जारी केला आहे. यादरम्यान मच्छिमारीसाठी खोल समुद्रात जाण्यास मनाई केलीये.

गोंदिया जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे खरीप हंगामाला मोठा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी भात पेरणीच्या कामांना वेग दिला असून अनेक ठिकाणी शेतांमध्ये पेरणी आणि रोहिणीची कामे सुरू आहेत. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात रोहिणीला सुरुवात झाली असून, सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांनीही आता पावसाचा फायदा घेत पेरणी सुरू केली आहे.

नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केट परिसरातील आतील रस्त्यामध्ये साचले पाणी. या रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले. या रस्त्यातून व्यापारी आणि ग्राहकांना मार्ग काढावा लागत आहे. एपीएमसी भाजीपाला मार्केट परिसरातील रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचंल्याने ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना नाहक त्रास सहन देखील करावा लागत आहे. जोरदार पाऊस नवी मुंबई परिसरात होताना दिसतोय. दुसरीकडे या पावसामुळे आता पेरण्यांना वेग आला. शेतकऱ्यांकडून पेरण्यांचे रखडलेले कामे पुर्ण केली जात आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us