राष्ट्रवादीत ढगाळ वातावरण, शिवसेना-भाजपचा पाऊस, अमर-अकबर-अँथनी सरकार, गुलाबराव पाटलांची चौफेर फटकेबाजी

पक्ष फुटण्याच्या बातम्या शरद पवार यांनीही नाकारल्या. यावरून गुलाबराव पाटील यांनी चपखल प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ' असं कोणी म्हणेल का? की पक्ष फुटतोय शरद पवार आहेत ते..

राष्ट्रवादीत ढगाळ वातावरण, शिवसेना-भाजपचा पाऊस, अमर-अकबर-अँथनी सरकार, गुलाबराव पाटलांची चौफेर फटकेबाजी
फाईल फोटोImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 3:31 PM

अनिल केऱ्हाळे, जळगाव: गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी फुलस्टॉप दिला. मी कुठेही जाणार नाही. स्वाभिमानातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आहे आणि अजूनही तो जपून ठेवणार आहोत. महाविकास आघाडी म्हणून आमची फळी अधिक मजबूत करणार आहोत, असं अजित पवार यांनी सांगितलं. मात्र तरीही राज्यात घडणाऱ्या घडामोडींवरून तरी अजित पवार या वक्तव्यावर फार काळ ठाम राहणार नाहीत, असं दिसून येतंय. विविध पक्षांच्या आमदारांनाही असंच वाटतंय. शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी सद्य राजकीय स्थितीवरून जोरदार फटकेबाजी केली.

ढगाळ वातावरण..

राज्यातील स्थितीवर गुलाबराव पाटील यांनी नेमकी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ हवानामाचा अंदाज बघता, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ढगाळ वातावरण आहे. शिवसेना -भाजपचा जोरदार पाऊस पडणार आहे…

आमदार काय उगाच बोलतात का?

अजित पवार यांनी सर्व शक्यता नाकारल्यावर गुलाबराव पाटील म्हणाले, पवार काहीही म्हणाले असले तरीही त्यांना ही सगळी जुळवाजुळव करायला वेळ लागेल. कालपासून आमदारांच्या प्रतिक्रिया येत आहेत. कोकाटे, बनसोडे, तटकरे बाई म्हणतात आम्ही अजितदादांच्या मागे आहेत. आमदार बोलतायत याचा अर्थ राष्ट्रवादीत ढगाळ वातावरण आहे. कधीही पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अजित पवार आता थांबणार नाहीत…

अजित पवार आता राष्ट्रवादीत फार काळ थांबणार नाहीत, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलंय. ते म्हणाले, ‘ अजित दादा आता थांबतील असं वाटत नाही. ते डॅशिंग नेते आहेत. त्या माणसालाही जीवन आहे. 24 तास काम करणारे माणूस आहेत. त्यामुळे ते घाबरून निर्णय घेतील असं नाही. जुळवाजुळव करायला थोडा वेळ घेतील, पण लवकरच ते भूमिका घेतील, असं सूतोवाच गुलाबराव पाटील यांनी केलंय.

पवार बोलतात, त्याच्या उलट होतं..

पक्ष फुटण्याच्या बातम्या शरद पवार यांनीही नाकारल्या. यावरून गुलाबराव पाटील यांनी चपखल प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ असं कोणी म्हणेल का? की पक्ष फुटतोय शरद पवार आहेत ते.. शरद पवार साहेब जे बोलतात त्याच्या उलट घडतंय असं लोक म्हणतात. हा भविष्यासाठीचा इशारा असू शकतो….

40 आकडा महत्त्वाचा

अजित पवार 40 आमदार घेऊन बाहेर पडणार अशी शक्यता वर्तवली जातेय. एकनाथ शिंदेदेखील 40 आमदारांसह बाहेर पडले होते.यावरून गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ राज्यात सध्या 40 हा आकडा महत्त्वाचा मानला जातो. 40 चांगला आकडा आहे.. बघू कधी पाऊस पडतो… जेव्हा काही या गोष्टी घडतात तेव्हा काही ना काही आखलेला असतं. सतरंजीवर बसायचे आहे तर केवढी पट्टी अंथरायची हे आपण ठरवत नसतो.. हे आधीच ठरलेलं असतं…

अजित पवारांनी राष्ट्रवादी सोडली तर शिंदे-फडणवीस-अजित पवार असं अमर अकबर अँथनीचं सरकार असेल, अशी टिप्पणीही गुलाबराव पाटील यांनी केली.

Non Stop LIVE Update
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.
मराठा तरूणांसाठी दिलासा, MPSC पदभरतीत जागांची वाढ नवी जाहिरात प्रसिद्
मराठा तरूणांसाठी दिलासा, MPSC पदभरतीत जागांची वाढ नवी जाहिरात प्रसिद्.
दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल, तिघे निर्दोष तर किती आरोपींना जन्मठेप?
दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल, तिघे निर्दोष तर किती आरोपींना जन्मठेप?.