AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्याची चाहूल, बाजारात हापूस दाखल, देवगड आंब्याच्या पहिल्या पेटीला मिळाला उच्चांकी भाव

Hapus Mango Rate: फळांचा राजा देवगड हापूस आंब्याला मोहोराने दगा दिला आहे. केवळ 30 टक्केच आंबा उत्पादन होणार आहे. बदलत्या हवामानाने हा घात केला आहे. तिसऱ्या टप्प्यातील मोहोरही गायब झाला आहे. यामुळे सर्वसामान्यांना स्वस्तात हापूस उपलब्ध होण्यासाठी मे महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.

उन्हाळ्याची चाहूल, बाजारात हापूस दाखल, देवगड आंब्याच्या पहिल्या पेटीला मिळाला उच्चांकी भाव
कोकणातून पहिली आंब्याची पेटी.
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 18, 2025 | 1:32 PM
Share

Hapus Mango Rate: उन्हाळ्याची चाहूल लागताच खव्वय्यांना हापूस आंब्याचे वेध लागतात. फेब्रुवारी, मार्चपासून बाजारात हापूस आंबे येण्यास सुरुवात होतात. परंतु सुरुवातीला हापूसचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात. त्यामुळे खव्वय्यांना आंब्यासाठी एप्रिल महिन्याची वाट पाहावी लागते. बाजारात हापूस आंबे आता दाखल होऊ लागले आहे. मुंबई, पुणे बाजारात काही दिवसांपूर्वी हापूस आंब्याची पहिली पेटी दाखल झाली होती. त्याला उच्चांकी दर मिळाला होता. आता साताऱ्यात देवगड हापूस दाखल झाला आहे. त्याला बोलीत उच्चांकी दर मिळाला आहे.

पेटीला मिळाला 20 हजार रुपयांचा उच्चांकी भाव

साताऱ्यात बाजार समितीच्या आवारात देवगड हापूस आंब्याच्या पहिल्या पेटी दाखल झाली. या पेटीसाठी व्यापाऱ्यांनी बोली लावली. यामध्ये एका व्यापाऱ्याने तब्बल 20 हजार रुपयांचा उच्चांकी भावाची बोली लावली. त्यानंतर देवगड हापूस आंब्याच्या मानाची पहिली पेटी ताब्यात घेतली. या बोलीनंतर व्यापाऱ्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला. यावेळी सातारासह परिसरातून मोठ्या संख्येने व्यापारी बाजार समिती परिसरात उपस्थित होते.

यंदा उत्पादन कमी

यंदा फळांचा राजा देवगड हापूस आंब्याला मोहोराने दगा दिला आहे. केवळ 30 टक्केच आंबा उत्पादन होणार आहे. बदलत्या हवामानाने हा घात केला आहे. तिसऱ्या टप्प्यातील मोहोरही गायब झाला आहे. यामुळे सर्वसामान्यांना स्वस्तात हापूस उपलब्ध होण्यासाठी मे महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.

सर्वसामान्यांसाठी स्वस्त उपलब्ध होणारा हापूस आंबा यावर्षी मात्र दुरापास्त होण्याची शक्यता आहे. खव्वय्यांसाठी आंब्याची चव यावर्षी महागणार आहे. मार्च महिना उजाडला तरीदेखील 1 डझन आंब्याची किंमत 1800 रुपयांपर्यंत आहे. आंब्याचे उत्पादन कमालीचे घटल्याने आंबा हंगाम लवकर संपण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मोहोर आला. मात्र अनुकूल वातावरण नसल्यामुळे व वांझ मोहोराचे प्रमाण जास्त असल्यामुळे पहिल्या टप्प्यात आंब्याचे उत्पादन 2 ते 3 टक्केच झाले आहे. त्यामुळे मार्च महिन्यात आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर राहणार आहे. 15 एप्रिलनंतर हापूसचे दर कमी होण्याची शक्यता आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत