AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाज वाटली पाहिजे, माफी मागा…, फडणवीस हर्षवर्धन सपकाळांवर संतापले, टिपू सुलतानवरून वातावरण तापलं

टिपू सुलतानवरून सध्या राज्यात पुन्हा एकदा वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं विधान केलं होतं, त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे.

लाज वाटली पाहिजे, माफी मागा..., फडणवीस हर्षवर्धन सपकाळांवर संतापले, टिपू सुलतानवरून वातावरण तापलं
devendra fadnavis Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 14, 2026 | 6:52 PM
Share

मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे.  या वादावर  प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं विधान केलं आहे. ‘टिपू सुलतान यांनी कधीच विषारी, विखारी विचारांना थारा दिला नाही. त्यामुळे टिपू सुलतान यांना शौर्याच्या बाबतीत शिवाजी महाराज यांच्या समकक्ष मानले पाहिजे’ असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान सपकाळ यांच्या या वक्तव्यानंतर आता वातावरण चांगलंच तापलं असून, भाजपकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस? 

हर्षवर्धन सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे, टिपू सुलतान सारख्या व्यक्तीची तुलना ते छत्रपती शिवरायांसोबत करत आहेत, हे अत्यंत निंदनीय काम आहे. छत्रपतींनी स्वराज्य उभारलं, मोगलांच्या जोखडांतून  सामान्य माणसाला मुक्त केलं. खऱ्या अर्थाने त्यांनी सामान्य रयतेचे राज्य स्थापन केलं. तर दुसरीकडे टिपू सुलतानने हजारो लाखो हिंदूंची हत्या केली. मात्र हर्षवर्धन सपकाळ दोघांची तुलना करून दोघांना सारखा सन्मान द्या, असे म्हणतात. यापेक्षा जास्त लांगुनचालन  या जन्मात मी पाहिलेलं नाही, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं की,  आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही. छत्रपती शिवराय आणि टिपू सुलतानची तुलना केल्याबद्दल सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे,  काँग्रेस पक्षात थोडी जरी नैतिकता राहिली असेल, तर काँग्रेसने सुद्धा त्यांच्या वक्तव्याची दखल घेतली पाहिजे. आणि आपली भूमिका देखील स्पष्ट केली पाहिजे.  हर्षवर्धन सपकाळ कोणत्या शाळेत इतिहास शिकले, याचं संशोधन केलं पाहिजे? हा जो नवा इतिहास ते लिहीत आहेत, तो इतिहास महाराष्ट्र आणि भारत कधीच खपवून घेणार नाही, असा इशारा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दिला आहे. दरम्यान यावरू आता वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.

Follow Us
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट रेल्वे रुळावरच... पहा व्हिडीओ
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप