कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; नागरिकांना दिलासा; शेतीवर होणार परिणाम

अचानक पाऊस झाल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची तारांबळ उडाली. वादळी वारे आणि पावसामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कडक उन्हाळ्याच्या या दिवसात पाऊस झाल्याने नागरिकांना उष्णतेपासून पासून काही वेळेसाठी दिलासा मिळाला.

कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; नागरिकांना दिलासा; शेतीवर होणार परिणाम
इचलकरंजीसह सांगली शहर परिसरात पावसाची हजेरीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 7:20 PM

इचलकरंजीः इचलकरंजी शहरासह (Ichalkarnji) ग्रामीण भागामध्ये वादळी पावसाची हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur) विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. कोल्हापूर, इचलकरंजी, हूपरी, कागल, गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यातही पावसाने (Rain) अचानकर हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. अचानक झालेल्या पावसामुळे बाजारापेठेत पाणी तुंबल्याने व्यावसायिकांचे हाल झाले.

अचानक पाऊस झाल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची तारांबळ उडाली. वादळी वारे आणि पावसामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कडक उन्हाळ्याच्या या दिवसात पाऊस झाल्याने नागरिकांना उष्णतेपासून पासून काही वेळेसाठी दिलासा मिळाला. कोल्हापूर जिल्ह्यात कडक उन्हामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली आहे. पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

काजू उत्पादनावर परिणाम

कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज, आजरा, भुदरगड आणि चंदगड तालुक्यात सध्या काजूचा हंगाम आहे. सध्या दाट धुकं पडल्यामुळे काजू उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. काजूही जास्त लागली नसल्याने या पावसाचा काजूवर काही परिणाम होतो का याच्या प्रतिक्षेत काजू उत्पादक आहे.

सांगली शहर व परिसरात पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत

सांगली शहर व परिसरात दुपारी साडे तीनच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. आज सकाळपासूनच सांगली शहरासह ग्रामीण परिसरात उष्णता जाणवत होती. त्यानंतर दुपार ढगाळ वातावरण निर्माण होऊन दुपारच्या सुमारास वादळी वारे व मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे उकड्यामुळे हैराण झालेल्या संगलीकरांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

उष्णतेमुळे नागरिक त्रस्त

सध्या सांगली जिल्ह्यातील वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत आहे. शहर परिसरासह ग्रामीण भागातही उष्णतेमुळे नागरिकांना त्रास होत आहे. उष्णतेमुळे कंटाळलेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे. सध्या द्राक्ष बागेतील कामंही आटपत आली असून ऊस तोडही संपत आली आहे. त्यामुळे या पावसाचा शेतीवर गंभीर परिणाम होणार नसल्याचे काही शेतकऱ्यांनी आपले मत व्यक्त केले.

संबंधित बातम्या

स्विगी, झोमॅटो विरोधात चौकशीचा फेरा, जाणून घ्या डिस्काउंटचं नेमकं गणित

“सीसीआय”च्या रडारवर Zomato-Swiggy, शेअर्स 5 टक्क्यांनी गडगडले; गुंतवणुकदारांत अनिश्चितता

Amravati Murder : गळा आवळून बायकोनं नवऱ्याला संपवलं! हत्येआधी पतीला इलेक्ट्रीक पोलला लटकवलं

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.