AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोलापूरमध्ये भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा

सोलापूरच्या माळशीरसमध्ये भीषण अपघात घडला आहे, पिकअर रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळल्याने तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.

सोलापूरमध्ये भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा
Solapur accidentImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 14, 2026 | 8:37 PM
Share

सोलापूर जिल्ह्यातील माळशीरसमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये पिकअप कोसळून हा अपघात घडला आहे. या अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्या विहिरीत हा पिकअप कोसळला ती विहिरी पाण्याने काठोकाठ भरलेली होती. लोकांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने या अपघातात आठ जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. दरम्यान या घटनेत ज्यांच्या मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांसाठी सरकारकडून मदतीची घोषणा करण्यात आली आहे. या घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांच्या मदतीची घोषणा सरकारने केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

‘सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी येथे एक वाहन खाजगी शेतातील विहिरीत पडल्याने झालेल्या अपघातात काही भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. सुदैवाने 7 जणांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक दोघेही तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत आणि स्थानिक प्रशासनाशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत. या घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारकडून देण्यात येईल.’  असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी येथे हे पिकअप विहिरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. हे आठही जण  पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील रहिवासी होते. ते म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. गावाकडे परत येत असताना हा अपघात झाला आहे. तर सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले