AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आजोबांनी दिलेलं नाव मी परत घेईन…’, उद्धव ठाकरे यांनी थेट निवडणूक आयोगाला ललकारलं

निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत पक्ष, नाव आणि चिन्ह चोरल्याचा आरोप शिंदे गटावर केला होता. तर, अमरावती येथे पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगालाच थेट आव्हान दिलं.

'आजोबांनी दिलेलं नाव मी परत घेईन...', उद्धव ठाकरे यांनी थेट निवडणूक आयोगाला ललकारलं
UDDHAV THACKERAYImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jul 10, 2023 | 11:54 PM
Share

नागपूर : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना कुणाची हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात जाऊन पोहोचला होता. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतही ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली होती. पाच खंडपिठाच्या न्यायालयाने त्यावर निकाल दिला. तर, न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला. शिवसेना हे नाव आणि पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिले. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत पक्ष, नाव आणि चिन्ह चोरल्याचा आरोप शिंदे गटावर केला होता. तर, अमरावती येथे पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगालाच थेट आव्हान दिलं.

अमरावती येथे उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देऊ शकते. पण, शिवसेना नाव नाही. कारण, शिवसेना हे नाव माझ्या आजोबा आणि वडिलांनी दिलंय. शिवसेना ही काय तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का? असा सवाल करत थेट आव्हान दिलंय.

शिवसेना हे नाव कसे मिळाले?

बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिक पाक्षिक सुरु केलं. त्यातील लेख वाचून त्यांच्या भोवती अनेक मराठी तरुण जमा होऊ लागले. त्यातील काही जणांनी बाळासाहेबांना संघटना काढण्याचा सल्ला दिला. सुरवातीला त्यांना नकाराची भाषा ऐकू आली. पण, बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनीही संघटना काढण्याचा सल्ला दिला.

मराठी माणसांची, मराठी हिताचे रक्षण करणारी संघटना काढू असे प्रबोधनकार म्हणाले आणि संघटना काढण्याचे ठरलं. प्रबोधनकार ठाकरे यांची त्या संघटनेला शिवाजीची सेना अर्थात शिवसेना हे नाव दिले.

शिवसेनेची स्थापना…!

बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिकच्या अंकात शिवसेना स्थापन करण्यात येत असल्याचे जाहीर केले. दादर येथील बाळासाहेब यांच्या निवासस्थानी मराठी तरुणांची एकच गर्दी होऊ लागली. अखेर, 19 जून 1966 चा तो दिवस उजाडला. बाळासाहेब ठाकरे यांनी घरातील लोकांच्या आणि काही निवडक तरुण सहकारी यांच्या उपस्थितीत शिवसेना या संघटनेची घोषणा केली. यावेळी केवळ अठरा लोक हजर होते. त्यात ठाकरे कुटुंबीयातील चौघे उपस्थित होते. त्यात प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे दोन बंधू हजर होते.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

शिवसेना हे नाव पक्षाला माझ्या वडिलांनी दिले होते. त्यामुळे ते हिरावून घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. ते तुम्हाला हिरावून घेऊ देणार नाहीच. ते नाव चोरलं आहे. नाव माझं आहे आणि ते माझंच राहील. पक्षाचे नाव कुणाला देण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला नाही. आयोगाचं काम काय तर आम्ही निवडणुकीत नियम पाळतो की नाही हे पाहणं आहे. उद्या आम्ही आयोगाचं नाव बदललं तर चालेल का? असा सवाल त्यांनी केला.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.